Full Width(True/False)

जेनेलिया देशमुख म्हणाली, रितेशशी लग्न केल्यावर ऐकले होते टोमणे

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आणि हिने ८ वर्षांपूर्वी लग्न केलं. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक म्हणून रितेश- जेनेलियाकडे पाहिलं जातं. लग्नानंतर जेनेलियाने तिचा जास्ती जास्त वेळ घराला दिला. यामुळेच काही वर्ष ती सिनेसृष्टीपासून दूर राहिली. आता जेनेलियाने रितेशशी लग्न करताना तिला लोकांनी काय सल्ले दिले होते याचा अनुभव शेअर केला. जेनेलियाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की लग्नाच्या वेळी लोकांनी तिला रितेशशी लग्न करण्याचा पूर्नःविचार करायला सांगितला होता. लग्नानंतर करिअर संपेल यामुळे रितेशशी लग्न करू नकोस असेही सल्ले देण्यात आले. पण काही करून जेनेलियाला रितेशशी लग्न करायचं होतं. त्यामुळेच तिने लोकांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. लग्नानंतर, जेनेलिया तिचं घर आणि मुलं यांच्या संगोपनात व्यग्र झाली. यांनी एकाच हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' हा दोघांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. रितेश आणि जेनेलिया यांना रायन आणि राहिल ही दोन मुलं आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37msbSj