मुंबई- सोमवारी करोना विषाणूसंबंधीत नियमांचं पालन न केल्याबद्दल खान, भाऊ आणि त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यानंतर बीएमसीने वांद्रेच्या ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये तिघांना क्वारन्टीन केलं आहे. कलम १८८ आणि २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज, सोहेल आणि निर्वान २५ डिसेंबर रोजी दुबईहून भारतात परत आले. नियमांनुसार तिघांनाही सात दिवस क्वारन्टीन राहणं बंधनकारक होतं. अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांनी ते हॉटेलमध्ये क्वारन्टीन होणार असल्याचं सांगितलं मात्र ते हॉटेलमध्ये न जाता थेट घरीच गेले. तिघंही घरी पोहोचल्याची बातमी समजल्यानंतर बीएमसी अधिकारी सोहेलच्या घरी गेले. कोविड-१९ ची चाचणी नकारात्मक आल्यावरच त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं. असं असलं तरी बीएमसीने सरकारी मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंग्लंड आणि दुबईसह युरोपमधील कोणत्याही देशातून परत आलेल्या नागरिकांना किमान सात दिवस स्वत:ला क्वारन्टीन करणं बंधनकारक आहे. डिसेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर हा नियम काटेकोरपणे लागू केला जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MovpxV