Full Width(True/False)

अमिताभ यांनी आषाढी एकादशीनिमित्त चाहत्यांना दिल्या 'विठ्ठलमय' शुभेच्छा !

मुंबई: बिग बी यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे बिग बींनी या शुभेच्छा मराठीमधून दिल्या आहेत. अमिताभ यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देताना एक सुंदर शेअर केलाय. 'देवषयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना ,वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा !!',असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. बिग बी प्रत्येत आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतात. इतर दिवशीही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातील फोटो शेअर करताना दिसतात. दरम्यान, आषाढी यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळं आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचं वेदनादायी चित्र पाहायला मिळालं. आषाढी यात्रा म्हटलं की ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता.मानाच्या संतांच्या पादुका आज सायंकाळी सरकारी नियमांच्या चौकटीत वाखरी येथे पोहचल्या. या पादुका पहिल्यांदाच अवघ्या २० भाविकांसह एसटी बसेसमधून वाखरी इथं आणल्या गेल्या. पादुका उतरल्यावर सोबत आलेल्या सर्व मानकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पादुका वाखरी पालखीतळावर नेण्यात आल्या. जे पालखी सोहळे लाखोंचा वारकरी भक्तमेळा घेऊन चालतात त्यांना यंदा करोनामुळं बसेसमधून येण्याची वेळ आली. वाखरी इथं शासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचं स्वागत केलं. यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत गेल्या आणि येथून सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झालं. तसंच आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले. विठुमाऊलीसमोर इथे कुणी मुख्यमंत्री नाही, कुणी अधिकारी नाही, सर्वजण एकसारखे आहेत. विठ्ठल पूजेचा मान मला कधी मिळेल आणि अशा परिस्थितीत महापूजा होईल, याचा कधीही विचार केला नव्हता. केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर विश्वाच्यावतीने माऊलीचरणी साकडे घातले आहे. लवकरात लवकर नव्हे, तर आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होवो. जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळे आणि निरोगी जीवन जगण्याचे भाग्य प्राप्त होवो, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली. पंढरपुरातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करू, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BqyxEs