मुंबई- राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री ने गेल्यावर्षी राजेशाही थाटात लग्न केलं होतं. दोघांनीही इन्स्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले होते. पण आता दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचं बोललं जात आहे. चारूने इन्स्टा प्रोफाइलवरून स्वतःच्या नावातलं राजीवचं आडनाव काढून टाकलं आहे. तर राजीवनेही मुंबई सोडून दिल्लीला जाणं पसंत केलं आहे. असं असलं तरी दोघांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चारूला मुंबईत सोडून दिल्लीला गेला राजीव लॉकडाउनच्या काळात राजीव आणि चारूमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाल्याचं म्हटलं जात आहे. सध्या राजीव दिल्लीत राहत आहे. याबद्दल त्याला विचारले असता, दोघांमध्ये सारंकाही ठिक असल्याचं त्याने सांगितलं. शिवाय कामाच्या निमित्ताने तो दिल्लीला आला असल्याचं राजीव म्हणाला. दुरावा आल्याचं दोघांनीही केलं अमान्य दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं जवळपास स्पष्ट आहे. अन्यथा चारूने तिच्या नावातून राजीवचं आडणाव हटवलं नसतं. तसंच दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले नसते. मात्र चारू आणि राजीवने असं काही नसल्याचं स्पष्ट करत दोघांमध्ये दुरावा आला नसल्याचं सांगितलं. गेल्या वर्षी ७ जून रोजी दोघांनी गोव्यात लग्न केलं होतं. ख्रिश्चन आणि बंगाली पद्धतीने दोघांनी लग्न केलं होतं. या लग्नाला सुष्मिताचा प्रियकर रोहमन शॉलही होता. खासगी फोटोंमुळे झाले होते ट्रोल- लग्नानंतर दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याचमुळे दोघांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं. तेव्हा चारूने स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, फोटोंमध्ये नाही तर पाहणाऱ्याच्या डोळ्यांमध्ये दोष आहे. 'मेरे अंगने में' या मालिकेतून चारू असोपा प्रसिद्ध झाली. हा प्रसिद्ध व्यावसायिक आहे. फक्त देशातच नाही तर दुबईतही त्याचा मोठा व्यवसाय आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZTFPJc