मुंबई:गेल्या साडेतीन महिन्यांपासून मराठी मालिकांचे जुने भाग पाहून प्रेक्षकांनीही कंटाळा आला आहे. आता शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मालिकेत काही बदल झाल्याचंही प्रेक्षकांना दिसणार आहे. अल्पावधीच लोकप्रिय झालेली मालिका '' या मालिकेतही असे काही बदल प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. 'अग्गंबाई सासुबाई' मालिकेत प्रेक्षकांना एक नवा ट्विट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पात्र तिच असणार आहेत. पण त्यांचं कधीही न पाहिलेलं रुप आता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मालिकेत आसावरीचा वेगळाच अवतार प्रेक्षक यापुढं पाहणार आहेत.नेहमीच सोहमच्या चुकींवर पांघरुण घालणाऱ्या आता सासूच्या भुमिकेतून सुनबाईच्या आईची होण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. येत्या १३ जुलैपासून मालिकेच नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून याचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये लाडक्या बबड्याची आई, म्हणजेच आसावरी बबड्याला ओरडताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्या ‘मी सुभ्राची सासू नाही तर आई आहे’असं बबड्याला म्हणताना दिसतेय.' त्यामुळं मालिकेत झालेला हा बदल पाहण्यासाठी पेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. संच, 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतही एक नवा बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राधिका-गुरुनाथ आणि शनाया या तिघांच्या गोष्टीनं सुरू झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका तुफान लोकप्रिय ठरली होती. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच शनायाच्या भूमिकेचे नखरे, तिचा मॅडनेस, तिची फॅशन प्रेक्षकांना आवडलं होतं. अभिनेत्री रसिका सुनीलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळत होती. पण, रसिकाला मध्यंतरी शिक्षणासाठी परदेशी जावं लागल्यानं मालिकेच्या एका टप्प्यावर शनायाचा चेहरा बदलला होता. तिच्या जागी अभिनेत्री ईशा केसकर शनाया म्हणून मालिकेत आली. तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं. पण, आता प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव ईशानं ही मालिका सोडल्याचं कळतंय. तर दुसरीकडे आता मूळची शनाया, म्हणजेच रसिका सुनील मालिकेत परतणार आहे. दरम्यान, नंतर टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाचं काम पुन्हा सुरू झालं असलं तरी, मालिकेच्या युनिटला चांगलीच धावपळ करावी लागतेय. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचं शूटिंग ठाण्यात होऊ न शकल्यानं तो सेट ठाण्याहून नाशिकला हलवण्यात आला. तसंच ' ' या मालिकेचं चित्रीकरणदेखील आता कर्जतला होणार आहे. यापूर्वी या मालिकेचा सेट मीरा रोडमध्ये होता. पण, आता तो कर्जतच्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आला आहे. शूटिंग करताना सेटवर खूप खबरदारी घेतली जातेय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DnnQD7