Full Width(True/False)

सुपरस्टार रजनीकांतची राजकारणातून माघार; 'हे' आहे कारण...

मुंबई: अभिनेते आणि दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टार (Rajnikanth) यांच्या राजकीय प्रवेशासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येतीच्या कारणावरून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर पत्रक शेअर करत रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे. येत्या ३१ डिसेंबरला आपण आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहोत. आणि येत्या जानेवारीत पक्ष लाँच करण्यात येईल, असं रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. परंतु आता तब्येतीच्या कारणामुळं त्यांनी राजकारणातू मागं हटण्याचा निर्णय घेतला आहे. 'गेल्या काही महिन्यांमध्ये माझ्या तब्येतीसंदर्भात जे काही घडलं. हा मी देवानं दिलेला एक इशारा समजतो. त्यामुळं २०२१ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करतोय', असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात अलिकडेच रजनीकांत यांचे पोस्टर्स झळकले होते. राजकारणापासून दूर राहण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचं आवाहन या पोस्टर्समधून करण्यात आलं होतं. 'वेल्लोर सिटीझन्स विशिंग फॉर अ चेंज' चे असेच एक पोस्टर समोर आलं होते. पुढच्या वर्षी तामिळनाडूची विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा राजकारणात न उतरण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चा यापूर्वीही बर्‍याचदा झाल्या होत्या. एवढचं नव्हे तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा रंगली होती. पण रजनीकांत यांनी मोठी घोषणा करत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तीन वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापल्याचं जाहीर केलं होतं. मध्यंतरी कमल हासन यांच्या बरोबरीनं काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पुढेंकाही झालं नाही. अशातच त्यांच्या प्रकृतीविषयी वावड्या उठल्या; मात्र पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर रजनी यांची राजकीय दिशा निश्चित झालेली दिसत असल्याचं म्हटलं गोलं.. यापुढे आध्यात्मिक राजकारण करायचे, या वक्तव्यातून त्यांच्यावर भाजपला शरण गेल्याची टीका झाली होती. मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि रक्तदाब रजनीकांत यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (Kidney Transplant) शस्रक्रिया पार पडली होती. ऑक्टोबर महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं डॉक्टरांना आढळळं होतं. त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांना करोना काळात बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसंच काही दिवसांपूर्वीच त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pvOlcj