Full Width(True/False)

कलाकार म्हणतायत फिल्म इंडस्ट्री म्हणजे 'मुंबई'च!

उत्तर प्रदेश राज्यात नवी फिल्मसिटी उभाण्यावरुन राजकीय आणि मनोरंजन विश्वात नवा वाद सुरू झाला आहे. नव्या फिल्मसिटीमध्ये मुंबईतील फिल्मइंडस्ट्री स्थलांतरीत करण्याचा विचार असल्याचं बोललं जातंय. तसंच मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा हेतू यात आहे, अशीही चर्चा होतेय. या नव्या फिल्मसिटीचं स्वागत कलाकारांनी केलं असलं तरी 'फिल्म इंडस्ट्री ही मुंबईतच राहणार असून तिचं महत्त्व कमी होणार नाही'; असं मत ते व्यक्त करताहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभी करणार, असल्याची घोषणा नुकतीच केली.उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चांवर योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'आम्ही इथे काहीही घेऊन जायला आलेलो नाहीये. आम्ही नवीन तयार करण्यासाठी आलोय. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा, समाजाला चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकानं दिली पाहीजे. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील फिल्मसिटी त्यांचं काम करेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.


कलाकार म्हणतायत फिल्म इंडस्ट्री म्हणजे 'मुंबई'च!

उत्तर प्रदेश राज्यात नवी फिल्मसिटी उभाण्यावरुन राजकीय आणि मनोरंजन विश्वात नवा वाद सुरू झाला आहे. नव्या फिल्मसिटीमध्ये मुंबईतील फिल्मइंडस्ट्री स्थलांतरीत करण्याचा विचार असल्याचं बोललं जातंय. तसंच मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा हेतू यात आहे, अशीही चर्चा होतेय. या नव्या फिल्मसिटीचं स्वागत कलाकारांनी केलं असलं तरी 'फिल्म इंडस्ट्री ही मुंबईतच राहणार असून तिचं महत्त्व कमी होणार नाही'; असं मत ते व्यक्त करताहेत.



​​प्रत्येक राज्यात उभारावी
​​प्रत्येक राज्यात उभारावी

इंडस्ट्री म्हणजे एकीकडून दुसरीकडे हलवावी अशी वस्तू नाही. प्रत्येक राज्यात सिनेमा बनवण्यासाठी पूरक वातावरण असेल तर त्याचा फायदा भारतीय सिनेसृष्टीला होणार आहे. केवळ हिंदी नाही तर प्रादेशिक भाषिक सिनेमांच्या निर्मितीत त्याचा फायदा होईल. सर्व राज्यांमध्ये फिल्मसिटी उभी राहिली तर तेथील आसपासच्या परिसरात चित्रीकरणाचे काम करणं सोयीचं होऊ शकतं. हैदराबादला मोठी फिल्मसिटी आधीपासून आहे. मराठी सिनेमांचं चित्रीकरण देखील तिकडे होतं. तरी मुंबईतील इंडस्ट्री तिकडे गेलीय असं झालेलं नाही. त्यामुळे आपण केवळ हिंदीचा विचार न करता भारतीय सिनेसृष्टीचा विचार करायला हवा.

- मनोज जोशी, ज्येष्ठ अभिनेते



राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा
राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा

मुंबईच महत्त्व कमी करणं; हा राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा वाटतो. मुंबई यापूर्वी देखील भारतीय सिनेजगताची राजधानी होती आणि ती तशीच राहील. केवळ उत्तर प्रदेशमध्येच का? प्रत्येक राज्यात फिल्मसिटी उभारली जावी. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात सोयीसुविधांसह चांगलं काम करता येईल. त्या निमित्तानं चित्रपटांमध्ये नवी लोकेशन दिसू लागतील. केवळ इतर राज्यात किंवा ठिकाणी स्टुडिओ आणि इमारती बांधून त्याला इंडस्ट्रीचा दर्जा मिळत नाही. तसंच यात मुंबईचं महत्त्व कुठेही कमी होत नाही. नव्या चित्रनगरीमुळे चित्रीकरणासाठीचा नवा पर्याय उपलब्ध होईल. त्यात इंडस्ट्रीचं स्थलांतर होणार नाही.

- महेश लिमये, सिनेमॅटोग्राफर



​केंदबिंदू मुंबईच
​केंदबिंदू मुंबईच

सध्याचा हा सर्व खेळ मी राजकीय डावपेच म्हणूनच बघतोय. एखादी चित्रनगरी किंवा तत्सम पायाभूत सुविधा इतर राज्यात उभारली जात असेल; तर ते चांगलंच आहे. पण, केवळ चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध झाली म्हणजे इंडस्ट्री स्थलांतरित झाली; असं होतं नाही. सिनेवितरणाचे जाळे, निर्मिती संस्थांची कार्यलये, चित्रीकरणाची पायाभूत सुविधा आणि इतर अनेक पूरक बाबी एकीकडून दुसरीकडे घेऊन जाता येणार नाहीत. नवी फिल्मसिटी इतर राज्यात उभारल्यानं सिनेनिर्मात्यांसमोर चित्रीकरणासाठी केवळ एक पर्याय उपलब्ध असेल. सिनेजगताचा केंद्रबिंदू हा मुंबईच आहे आणि तोच राहील. पण, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा काही संबंधितांचा हेतू असेल तर ते इतक्यात होऊ शकणार नाही.

- चिन्मय मांडलेकर, लेखक/अभिनेता



​परंपरा कायम राहणार
​परंपरा कायम राहणार

मुंबईची सिनेसृष्टी केवळ मुंबईसाठीच मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी आहे. त्यामुळे 'फिल्म इंडस्ट्री आणि मुंबापुरी' हे समीकरण कायमस्वरूपी अबाधित राहणार आहे. इतर कोणत्याही राज्यात नवी फिल्मसिटी उभारल्यानं मुंबईचं महत्त्व कमी होण्याइतकं ते तकलादू नाही. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीची शंभर वर्षांची परंपरा तशीच पुढे सुरु राहणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये चित्रनगरी उभी राहिल्यास त्याचा फायदा सिनेनिर्मितीलाच होईल. एकंदरच काम खूप आहे. मग ते हिंदी सिनेमांचं असो किंवा प्रादेशिक भाषिक सिनेमांचं. त्यामुळे चित्रीकरणाचं काम मुंबईतून तिकडे गेलं तरी काही फरक पडणार नाही.

- नीना कुळकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री



हे इथेच राहणार!
हे इथेच राहणार!

ज्या मुंबईने आणि फिल्म इंडस्ट्रीनं नाव, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा दिली तिला आयुष्यात विसरणार नाही आम्ही. उत्तर प्रदेशमध्ये इंडस्ट्री उभी कराल पण मुंबईचं टॅलेंट, मोठं मन आणि 'स्वातंत्र्य' कुठून आणाल? सिनेमा करायला स्वातंत्र्य लागतं! का फक्त प्रचारक सिनेमे करणार?' अशी बोचरी प्रतिक्रिया दिग्दर्शक अभिनेता प्रियदर्शन जाधव यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नोंदवली आहे. सोबतच दिग्दर्शक समीर विद्वांस यानं एक खास फोटो शेअर करुन पोस्ट लिहिली आहे. 'ही आमची महिला शक्ती.. वेशभूषा, छायांकन, कला दिग्दर्शन, दिग्दर्शन, रंगभूषा, निर्मिती करणाऱ्या या आमच्या महिला राज. त्यांच्यासह काम करताना आनंद आणि अभिमान वाटतो. कितीही काहीही करा! हे युपीत जाणार नाही! हे इथेच राहणार आणि घडणार! आमच्या महाराष्ट्रात!' या आशयाची ती पोस्ट आहे. शब्दांकन : कल्पेशराज कुबल





from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ooJTvo