Full Width(True/False)

'नगरसेवकांना २५ हजारांच्या पगारात ३० हजाराचा हफ्ता कसा परवडतो'

मुंबई- देशात करोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. औषधांचा तुटवडा आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. सगळीकडेच चिंतेचं वातावरण आहे. त्यात सरकार, राजकारणी एकमेकांकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकून सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत. या भयंकर परिस्थितीवर मराठमोळा अभिनेता याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील आणि राज्यातील राजकारण्यांना त्याने प्रश्न विचारले होते. एवढंच नाही तर त्याने नगरसेवकांचाही समाचार घेतला आहे. आस्तादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर '' हा उपक्रम सुरू केला आहे. ज्यात तो आपल्या देशातील भ्रष्ट कारभारावर आणि राजकारण्यांच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. या उपक्रमात त्याने नगरसेवकांना प्रश्न विचारले आहेत. त्याने पोस्ट करत लिहिलं, 'आता महाराष्ट्रातील 'नगर' 'सेवकां' चा पगार (सरकारी पगार) हा फारफारतर २५ हजार रुपये इतका असतो. त्यातही पुणे, मुंबई आणि नागपूर इथल्या नगरसेवकांचा पगार इतका असतो. आता पुणे- मुंबईत मी राहिलो आहे. २५ हजारांमध्ये हे असं राहणीमान नाही हो परवडत! महागड्या गाडीचा फॉर्च्युनरचा हफ्ताच ३० हजारांचा असतो. (जर द्यायचा असेल तर अर्थात!) चला प्रश्न विचारुया' असा प्रश्न विचारात आस्तादने स्थानिक नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सामान्य जनतेसमोर आणला आहे. एवढ्या कमी पगारात यांना एवढ्या महागड्या गाड्या घ्यायला कसं जमतं, असं त्याने म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी पाठिंबा दिला आहे. अनेक युझर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका युझरने म्हटलं, 'खरं आहे. असे अनेक प्रश्न समाजाला पडले आहेत. पद स्वीकारताना आणि त्यानंतरच्या व्यक्तीत कमालीचा फरक पडतो. किमान मनाची लाज तरी बाळगायला हवी या सेवकांनी. हे चित्र बदलेल का आणि काय करता येईल यासाठी ? अशी कमेंट करत त्यांचा राग व्यक्त केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SiaNKP