Full Width(True/False)

हे करण्यालाठी किती पैसे मिळाले? जावेद अख्तर सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : या रिअॅलिटी कार्यक्रम सातत्याने वादाच्या भोव-यामध्ये अडकलेला आहे. याआधी कोणत्याही रिअॅलिटी कार्यक्रमात इतके वाद निर्माण झाले नव्हते. या कार्यक्रमातील स्पर्धकांपासून ते परीक्षकांपर्यंत सर्वांनाच सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, कार्यक्रमात येणा-या प्रमुख पाहुण्यांना देखील आता ट्रोल केले जात आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना याआधी ट्रोल करण्यात आले होते. आता ज्येष्ठ यांनाही ट्रोल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या इंडियन आयडल १२ कार्यक्रमात जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी कार्यक्रमातील सर्व स्पर्धकांनी जावेद अख्तर यांनी लिहिलेली गाणी गात त्यांचा सन्मान केला होता. यावेळी सातत्याने ट्रोल झालेल्या शनमुखाप्रियाने गाणे गायल्यानंतर जावेद अख्तर यांनी तिचे भरभरून कौतुक केले. जावेद अख्तर तिला म्हणाले, 'युट्यूबवर मी तुझी अनेक गाणी ऐकली आहेत. आज तुला प्रत्यक्षात गाणे गाताना बघत आहे. आता जशी तू गात आहे, तशीच गात रहा. तुझे भवितव्य उज्ज्वल आहे...' या शब्दांत तिचा गौरव केला. जावेद अख्तर यांनी करणे काहीजणांना अजिबात आवडले नाही. आधीच सोशल मीडियावर शनमुखाप्रियाला तिच्या गाण्यावरून ट्रोल केले जात होते. आता तिच्यासोबत जावेद अख्तर यांच्यावरही टीका होत आहे. शनमुखाप्रियाचे कौतुक केल्यामुळे जावेद अख्तर यांच्यावरही सोशल मीडियावर टीका होत आहे. एका युझरने लिहिले, 'जावेदसर तुम्हांला पैसे देऊन या कार्यक्रमात बोलावले आहे का... जर असे नसेल तर तुम्ही शनमुखाप्रियाचे खोटे कौतुक करायला नको होते. उलट तिच्या गाण्यातील त्रुटी सांगायला हव्या होत्या. जेणे करून ती भविष्यात तरी चांगले गाईल...' अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की, गाण्याला न्याय देत नाही. त्यामुळेच जावेद अख्तर यांनी तिचे कौतुक करायला नको होते. एका युझरने तर मीम शेअर केले आहे. त्यामध्ये लिहिले आहे, 'ओरडण्याचे ५० रुपये कापून घ्या...' असे लिहिले आहे. तर दुस-या एका युझरने लिहिले आहे की, 'शनमुखाप्रिया गात नाही तर ओरडते. तिच्या आवजाची जातकुळी देखी चांगली नाही. आता इंडियन आयडल २०२१ मधील माझा रस संपला आहे...' आणखी एका युझरने लिहिले आहे की, 'शनमुखाप्रमाणे तिचे चाहते देखील ओरडत आहेत...' इंडियन आयडल १२ स्पर्धेतून शनमुखाप्रिया काढून टाकायला हवे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु तिच्यासाठी या कार्यक्रमातील अनेक चांगल्या गायकांना स्पर्धेच्या बाहेर काढण्यात आल्याचा आरोपही अनेकवेळा करण्यात आला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3doFFkx