Full Width(True/False)

BBM3: मी जाईन तेव्हा प्रत्येकजण रडेल..; नॉमिनेट झालेल्या शिवलीलानं घरातील सदस्यांना सुनावलं

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम सुरू होऊन आता आठवडा उलटला आहे. कार्यक्रमातील टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जीवाचा आटापिटा करत आहेत. आता या कार्यक्रमात स्पर्धकांसाठी दिवसागणिक अवघड टास्क दिले जात आहेत. सध्या कार्यक्रमामध्ये बिग बॉसने सर्व स्पर्धकांना 'नाव मोठं, लक्षण खोटं' हा नॉमिनेशनचा टास्क दिला आहे. कार्यक्रमात 'नाव मोठं, लक्षण खोटं' हा नॉमिनेशन टास्क सुरू होण्याआधी सर्व स्पर्धकांच्या जोड्या लावण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात १५ स्पर्धक असल्यामुळे सहा जोड्या आणि एक त्रिकूट करण्यात आले आहे. या जोड्यांमध्ये स्नेहा व मीरा, सोनाली व सुरेखा, दादूस आणि तृप्ती, जय व गायत्री, विशाल व विकास, उत्कर्ष व अक्षय, तर , मीनल आणि या त्रिकूटाची निवड करण्यात आली. आता यापुढील टास्क या सर्वांना जोडी जोडीने करावे लागणार असल्याचा आदेश बिग बॉसने दिला. त्यानंतर बिग बॉसने या सर्वांना 'नाव मोठे लक्षण खोटे' हा टास्क दिला. त्यामध्ये या जोड्यांनी त्यांना वाटत असलेल्या जोड्यांना नॉमिनेट केले आणि त्यांच्या नावाची पाटी हातोड्याने फोडली. या आठवड्यात घरातून बाहेर जाऊ शकणा-या म्हणजेच नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये जय, गायत्री, शिवलीला, अविष्कार, मीनल, विकास आणि विशाल यांचा समावेश आहे. कालच्या भागामध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्यांना त्यांचे मनोगत मांडण्याची संधी देण्यात आली. पहिली संधी अविष्कार, मीनल आणि शिवलीला या त्रिकुटाला मिळाली आहे. यामध्ये मीनलने तिचे मत मांडले. त्यावेळी तिने स्नेहा वाघ सेफ असल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यावरून मीनल आणि स्नेहामध्ये मोठा वाद देखील झाला. दोघींनी आपापले मुद्दे सर्वांसमोर मांडले. परंतु ओव्हर ऑल मीनलने जे जे मुद्दे मांडले ते सर्व स्नेहाने आणि तिला साथ देणा-या जयने खोडून काढले. आता बिग बॉस मराठी ३ च्या आजच्या भागामध्ये मीनलनंतर शिवलीलाने तिची बाजू मांडताना दिसणार आहे. शिवलीलाने अत्यंत संयत शब्दांत परंतु ठामपणे तिची बाजू मांडताना दिसते आहे. शिवलीला म्हणाली, 'कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला वातावरणात रुळायला, हा खेळ समजून घ्यायला वेळ लागला...मी कीर्तनामधून लोकांना सांगते दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं... याचा अनुभव मला आला. परंतु आता मला हे सारे कळून चुकले आहे. येथून पुढे घरातील प्रत्येक ठिकाणी माझा सहभाग असेल...' अशी खात्री तिने दिली. शिवलीला पुढे म्हणाली की, ' घरात येताना मी म्हटले होते की बिग बॉसचे घर हे केवळ भांडणाचे घर आहे असे सगळे जण म्हणतात. बाहेरच्या लोकांमध्ये असाच समज आहे की या घरात कुचाळक्या होतात, भांडणे होतात, एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण केले जाते...परंतु मी इथे आले तेव्हा असा विचार केला होता की, इथला प्रत्येक माणूस माझा असेल. मी जरी आठ दिवस या घरात राहिले ना तरी जेव्हा मी जाईन तेव्हा जाताना प्रत्येक सदस्याच्या डोळ्यात पाणी असेल...' असे भावूक प्रतिक्रिया शिवलीलाने व्यक्त केली. यावर घरातील स्नेहासह सर्वच सदस्यांनी उत्स्फूर्तपणे तिचे टाळ्या वाजवून कौतुक केले.. अर्थात या सर्व सदस्यांनी शिवलीलाने व्यक्त केलेल्या मनोगतावर तिचे जे कौतुक केले ते खरोखरच होते की ते देखील त्यांच्या खेळाचा एक भाग होता. हे आता बिग बॉस मराठी ३ च्या आगामी भागांमधूनच कळेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39JxnBw