मुंबई : ओटीटी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, भांडणे तर काही स्पर्धकांमधील प्रेमप्रकरणे या सर्वांची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये जो काही मसाला आहे त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात काही स्पर्धक आपापसात भांडत आहेत तर काही स्पर्धकांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. यामध्ये आणि यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. या दोघांमधील नाते हळूहळू मैत्रीच्या पलिकडे जाऊ लागले आहे. राकेश कायमच बिग बॉसच्या घरात राकेश शमिताशी कायम जवळीक साधताना दिसत आहे. राकेशच्या कुटुंबाने दिली प्रतिक्रिया शमिता शेट्टी आणि राकेश बापट ही जोडी सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाली आहे.त्यामुळे आता या दोघांच्या नात्यावर त्यांच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये निर्माण झालेली जवळीक पाहता राकेशच्या घरच्यांची यावर प्रतिक्रिया दिली आहे. राकेशची बहिण म्हणाली... राकेशच्या बहिणीने त्या दोघांमध्ये निर्माण झालेली जवळीक पाहून म्हणाली, 'ते दोघेजण एकमेकांसोबत खूपच छान दिसतात.' ती पुढे म्हणाली, ' मला त्या दोघांचे नाते खूपच क्यूट वाटते. दोघांमधील केमेस्ट्री खूपच कम्माल आहे. दोघांमध्ये जे बाँडिंग निर्माण झाले आहे ते छान आहे. कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. परंतु हा राकेशचा खासगी प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही...' राकेशबाबत बहिणीला वाटते काळजी राकेशच्या बहिणीने पुढे सांगितले की, 'राकेश फारसा बोलणार नाही आणि त्याला फार लोकांमध्ये राहणे आवडत नाही. आम्ही बिग बॉस बघत नाही. त्यात खूप भांडणे होतात, हे आम्हाला माहिती आहे. माझा भाऊ अतिशय शांत स्वभावाचा असल्याने त्याला शांततेत रहाणे आवडते. आता आम्हाला हे समजते आहे की, तो बिग बॉसच्या घरात कसा रहात असेल...' घरातही त्या दोघांचीच चर्चा राकेशच्या बहिणीने पुढे सांगितले की, 'आम्हाला काही कळायच्या आधीच राकेश आणि शमितामधील भांडण संपले होते. माझ्या मुलींना त्यांच्या मामाला टीव्हीवर पहाणे आवडते. आम्ही जेव्हा जेवायला एकत्र बसतो तेव्हा बिग बॉस, शमिता आणि राकेशचीच चर्चा करतो.' शमिता आणि राकेश यांच्यात निर्माण झालेल्या जवळीकची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे... दोघांमध्ये झाले होते भांडण दरम्यान, दिव्या आणि शमिता जेव्हा घरात आले तेव्हा त्या दोघींमध्ये छान बाँडिंग जमले होते. परंतु वीकेंडला त्यांच्यात मोठे भांडण झाले. त्यानंतर त्यांनी एकमेकींशी बोलणे सोडून दिले. शमिताने दिव्यापासून फारकत घेतली. इतकेच नाही तर तिचा पार्टनर असलेल्या राकेशनेही तिच्यापासून लांब रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु राकेश दिव्याशी बोलतो. त्यावरून शमिताने राकेशला सतत टोचून बोलू लागते. शमिताचे सततचे तेच तेच बोलणे ऐकून राकेश वैतागतो आणि तिला म्हणतो की त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडण होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YuTFEM