मुंबई- बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि प्रसिद्ध विनोदवीर यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा कृष्णाने गोविंदासोबत कार्यक्रम करण्यास नकार दिला आहे. गोविंदा '' मध्ये आपल्या पत्नीसह सहभागी होणार आहे. परंतु, गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा कृष्णाने त्याच्या मामासोबत कार्यक्रम करण्यास नकार दिला आहे. हे दुसऱ्यांदा घडत आहे जेव्हा कृष्णाने कार्यक्रम करायला नकार दिला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२० मध्ये देखील कृष्णाने त्या एपिसोडमध्ये काम केलं नव्हतं ज्यात गोविंदाने आपल्या पत्नीसह कार्यक्रमाला हजेरी लावली होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणाला, 'मी गेले १५ दिवस रायपूर आणि मुंबई असा प्रवास करतोय. चित्रपट आणि माझा कार्यक्रम यांसाठी मी कायम तारखा ठेवतो. पण जेव्हा मला कळालं की गोविंदा पाहुणे म्हणून कार्यक्रमात येणार आहेत तेव्हा मला या भागात सहभागी व्हायचं नाहीये. म्हणून मी तारखा दिल्या नाहीत. मला वाटतं आम्हा दोघांनाही एकत्र दिसायचं नाहीये. हे माझ्याकडूनही आहे आणि त्यांच्या कडूनही आहे. हा एक कॉमेडीचा कार्यक्रम आहे. माहित नाही कधी कोणत्या विनोदावरून त्यांना वाईट वाटेल आणि उगीच वाद होईल. मला कुठलाच वाद निर्माण करायचा नाहीये.' कृष्णा पुढे म्हणाला, 'मला माहीत आहे की जेव्हा मी आणि गोविंदा एकाच मंचावर येऊ तेव्हा प्रेक्षक आमच्यात घडलेल्या प्रकाराबद्दल ऐकायला उत्सुक असतील. त्यापेक्षा मी सहभागी न होणं जास्त योग्य ठरेल. कलाकार खूप भावनिक असतात त्यांना काम करायचं असतं पण तिथे नाही जिथे तुम्हाला एकमेकांचा चेहरादेखील पाहायचा नाही. आमच्यातील दुरावा अजूनही संपलेला नाहीये. आमच्यातील वाद अजूनही मिटलेला नाही. मी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना किंवा कपिलला गोविंदाला न बोलवण्याबद्दल काहीही बोललो नाहीये. हा आमच्या घरातील वाद आहे. त्याचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाहीये.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3h0o1oY