मुंबई- छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारी मालिका '' पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. 'आई कुठे काय करते' मालिका गेले कित्येक आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरत आहे. मालिकेचं कथानक आणि परिपूर्ण कलाकार यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या निरनिराळ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता पुन्हा एकदा ताणली गेली आहे. घटस्फोटानंतर अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यातील वाढती जवळीक संजनासाठी मात्र डोकेदुखी ठरू लागली आहे. संजनासोबत लग्न करण्यासाठी अनिरुद्धने अरुंधतीपासून घटस्फोट घेतला. संजना आणि अनिरुद्ध यांचं लग्नही झालं. परंतु, कांचन यांची तब्येत ठीक नसल्याने अरुंधतीला घरात राहणं भाग पडलं. आता तर अप्पांनी त्यांचं राहतं घर अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या नावे केल्याने संजनाचा पुरता हिरमोड झाला आहे. आता अरुंधती तिच्या घरात कधीही येऊ शकते याची जाणीव झाल्याने संजनाचा रागाने तिळपापड झाला. त्यात इशा, यश आणि अभिषेक यांच्यासाठी अरुंधती आणखी काही दिवस समृद्धी बंगल्यात राहण्याचा निर्णय घेते. अरुंधती संजनाला सडेतोड उत्तर देत असल्याने संजनाचा देखील नाईलाज झाला आहे. त्यात एकाच घरात राहिल्यामुळे अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यातील जवळीकही वाढत आहे. अशात कात्रीत सापडलेली संजना काय निर्णय घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय अरुंधती आणि अनिरुद्ध पुन्हा एकत्र येणार का की संजना अरुंधतीला घराबाहेर काढण्यासाठी काही नवा डाव खेळणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tvR4G7