मुंबई- ज्येष्ठ कवी, गीतकार आणि पटकथा लेखक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली आहे. या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, , विहिंप आणि बजरंग दल आणि सारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही फरक नाही. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय संविधान एक अडथळा बनत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील. गीतकार अख्तर यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण जगात उजवे (राइट विंग) आहेतच. देशातील अल्पसंख्याकांना मारहाण करणाऱ्या जमावावर ते म्हणाले, 'तालिबान होण्यासाठीचा हा सराव आहे. त्यांच्याप्रमाणेच हेही लोक वागत आहेत. दोघांमध्ये फरक फक्त नावाचा आहे. त्यांच्या मार्गात भारतीय राज्यघटना उभी आहे, पण संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडायला मागे पुढे पाहणार नाहीत. यापूर्वी तालिबान्यांनी सत्ता प्रस्तापित करण्यावर आनंद व्यक्त करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवरही याआधी टीका केली आहे. 'दोघांची मानसिकता सारखीच' आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलासारख्या संघटनांना समर्थन देणाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जावेद अख्तर यांनी दिला. ते म्हणाले, 'तालिबान रानटी आहेत, पण तुम्ही ज्यांना पाठिंबा देत आहात त्यांच्यात आणि तालिबानमध्ये काय फरक आहे? त्यांचं उद्दीष्ट मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहेत. दोघांची मानसिकता सारखीच आहे. अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यावर भारतातील मुस्लिमांचा एक गट आनंद व्यक्त करत आहे. यावर आपलं मत देताना अख्तर म्हणाले, 'असे लोक संख्येने खूप कमी आहेत. या वक्तव्यांमुळे बहुतांश भारतीय मुस्लिम अस्वस्थच झाले आहेत. पण देशात असेही काही लोक आहेत ज्यांचेही ध्येय तालिबान्यांसारखेच आहे. महिलांनी मोबाइल फोन वापरू नये, रोमियोविरोधी ब्रिगेड त्याच दिशेने वाटचाल करत आहे. तालिबान आणि तालिबान्यांसारखे बनण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मला बरीच समानता दिसते. जगातील सर्व उजवे एकसारखेच आहेत जगातील सर्व उजवे (राइट विंग) समान असल्याचे सांगत अख्तर म्हणाले की, 'ख्रिश्चन उजवे असो, मुस्लिम उजवे असो किंवा हिंदू उजवे असोत, सर्वांमध्ये समानता आहे. तालिबानला इस्लामिक राज्य निर्माण करायचे आहे. यांना हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. ते म्हणतात, ज्यांची परंपरा वेगळी आहे, ते त्यांना स्वीकारणार नाहीत. या लोकांना मुलगा आणि मुलगी एकत्र उद्यानात जाऊ नयेत असे वाटते. दोघांमधील फरक हा आहे की ते अद्याप तालिबानइतके शक्तिशाली नाहीत, पण तालिबानी लोकांचे जे ध्येय आहे तेच याही लोकांचे आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DPCNIQ