Full Width(True/False)

विद्या बालनचा डिनरला नकार; मंत्र्यानं चित्रपटाचं शूटिंग थांबवलं?

मुंबई: अभिनेरी सध्या तिच्या आगामी 'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांत शूटिंगमध्ये अनेकदा अडथळे आहे आहेत. असं असताना मध्य प्रदेशच्या वनमंत्र्यांनी या चित्रपटाचं शूटिंग थांबवल्याचं समोर येत आहे. चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यामागचं कारणही प्रचंड चर्चेत आहे. वनमंत्र्यांनी डिनरसाठीचं दिलेलं आमंत्रण विद्या बालन हिनं नाकारलं, म्हणून तिच्या चित्रपटाचं शूटिंग थांबण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत.विद्या बालनच्या शेरनी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी २१ नोव्हेंबर पर्यंत परवानगी देण्यात आली होती. परंतु काही कारणं पुढं करत हे शूटिंग थांबवण्यात आलं होतं. मध्य प्रदेशचे वनमंत्री यांनी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण पाठवलं होतं. परंतु विद्या बालन हिन डिनसाठी नकार दिला. याच रागातून त्यांनी शूटिंग थांबवल्याचं म्हटलं जात आहे. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान विद्या बालन आणि विजय शाह यांच्यात भेट होणार होती. पण शाह यांनी संध्याकाळचे पाच वाजवले. विजय शाह शेरनी चित्रपटाचं शूटिंग सुरू असलेल्या स्थळापासून जवळच थांबले होते. तिथंच त्यांच्या रात्रीच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती. उशिर झाल्यामुळं शाह यांना विद्या बालन हिला डिनरसाठी म्हणेज रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण पाठवलं होतं. ...म्हणून विद्यानं दिला डिनरला नकारशाह यांचं डिनरचं आमंत्रण विद्यानं नाकारलं. कारण, विद्या शूटिंग सुरू असलेल्या सेट पासून दूर गोंदियामध्ये वास्तव्याला होती. हे अंतर जवळपास४० किमी इतकं आहे. त्यामुळं तिनं रात्री डिनरसाठी थांबण्यास नकार दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33q5oEd