Full Width(True/False)

लता मंगेशकरांवर झाला होता विषप्रयोग; समोर आलं खळबळजनक सत्य

मुंबई- गानसम्राश्री यांना भारतात ओळखत नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही.. फक्त भारतातच नाही तर त्यांच्या गायनाचे जगभरात कोट्यवधी लोक आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो हिंदी सिनेमांमध्ये आणि मराठी, बंगाली, आसामी यांसह ३६ प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांचं मूळ नाव हेमा मंगेशकर आहे. भारतातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडली १९६२ मध्ये लता दीदी यांना 'बीस साल बाद' सिनेमासाठी एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. त्यासाठी संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली होती. परंतु रेकॉर्डिंग करण्याच्या काही तास आधी लतादीदींची तब्येत अचानक बिघडली. सकाळपासूनच त्यांच्या पोटात दुखू लागलं. सतत उलट्या होऊ लागल्या. त्यांची तब्येत एवढी खालावली की त्यांना हलताही येऊ शकत नव्हतं. लता मंगेशकर यांच्यावर करण्यात आला होता विषप्रयोग लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांना तातडीने बोलावून घेण्यात आलं. डॉक्टरांनी योग्य त्या चाचणीने उपचार सुरू केले. जवळपास तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर लता दीदी यांना थोडं बरं वाटू लागलं. जवळपास १० दिवसानंतर, त्यांच्या तब्येतीत सुधार येऊ लागला. याचवेळी डॉक्टरांना लता दीदी यांच्यावर जेवणातून विषप्रयोग करण्यात आल्याचं सांगितलं. बहिणीने केला लता दीदींसाठी स्वयंपाक लता मंगेशकर जवळपास तीन महिने पलंगावर होत्या. या घटनेनंतर संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांनी स्वतः सगळी जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत बहीण उषा मंगेशकर यांनी स्वत: स्वयंपाक करण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे या घटनेनंतर त्यांचा स्वयंपाकी अचानक गायब झाला. कधीच गाऊ शकणार नाहीत लता दीदी? या काळात अनेक अफवांनाही पेव फुटला होता. डॉक्टरांनी लता मंगेशकर यापुढे कधीच गाऊ शकणार नाहीत असं म्हटल्याचं अनेक ठिकाणी बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात त्यात काहीही तथ्य नसल्याचं लता दीदी स्वतः म्हणाल्या. दीदी म्हणाल्या की, 'या प्रकरणाबद्दल आम्ही मंगेशकर फारसं बोलत नाही. कारण आमच्यासाठी तो फारच वाईट काळ होता. पण मी गाऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी कधीच सांगितलं नाही. या सगळ्या अफवाच आहेत. उलट माझे डॉक्टर आर.पी कपूर यांनी उत्तमरित्या माझ्यावर उपचार केले. मी लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभी रहावी म्हणून सर्वतोपरि प्रयत्न केले. पण इतकी वर्ष या घटनेबद्दल उठणाऱ्या अफवांवर मी सांगू इच्छिते की त्या प्रकरणानंतर मी माझा आवाज गमावला नाही.' याउलट या घटनेनंतर जेव्हा लता मंगेशकर यांनी गाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेमंत कुमार यांनी त्यांना पहिलं गाणं देऊ केलं. याबद्दल बोलताना लता दीदी म्हणाल्या की, 'एक दिवस हेमंतजी माझ्या घरी आले होते. मला गाऊ देण्यासाठी माझ्या आईची परवानगी घ्यायला ते आले होते. तसेच गाणं गाताना मला त्रास होत आहे असं जाणवलं तर ते लगेच मला घरी सोडतील.' यानंतर त्यांनी बीस साल बाद या सिनेमातील 'कही दिप जले कहीं दिल' हे गाणं गायलं. या गाण्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HHVUwt