मुंबई- वाहिनीवरील अत्यंत गाजलेली मालिका '' ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला होता. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंस वाटू लागलं होतं. सिद्धी आणि शिवाची जोडी तर छोट्या पडद्यावर भरपूर गाजत होती. परंतु, ३ एप्रिल रोजी मालिकेने सगळ्यांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे मालिकेचा लेखक असलेला अभिनेता याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने रसिक प्रेक्षकांपासून मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांचे आभार मानले आहेत. चिन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, '५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन 'जीव झाला येडापिसा' चा प्रवास आज थांबतो आहे. माझ्य‍ा काळजाच्या खूप जवळची ही माझी मालिका. पुराशी, कोविडशी लढली... कलेकलेनं वाढली... पाच भाषांमध्ये हीच्या आवृत्त्या निघाल्या. त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास ‍थांबेल. कधी थांबणारपेक्षा क‍ा थांबलात हा प्रश्न कधीही गोड वाटतो. सर्व कलाकार तंत्रज्ञांचं अभिनंदन आणि आभार. विनोद लवेकर, निखील शेठ, कल्याणी पठारे, दीपा तेली, विशाल, दत्ता संग्राम, तुषार जोशी तुम्ही जे दिलंत त्यासाठी भरपूर प्रेम आणि आभार. मी तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल क्षमा. दीपक राजाध्यक्ष खूप खूप आभार तू दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि मनापासून शिवा, सिद्दी, जलवा, सोनी, आत्याबाई, सरकार आणि संपूर्ण रुद्रायतच्या जगावर प्रेम करणार्‍या रसिकांचे.' अशा गोड शब्दात चिन्मयने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मालिकेतील सिद्धी आणि शिवाची भांडणं आणि तेवढंच प्रेम पाहायला प्रेक्षकांना मजा येत होती. चिन्मयच्या या पोस्टवर प्रेक्षकांनीही त्याचं आणि मालिकेचं कौतुक केलं आहे. मालिका नेहमी त्यांच्या हृदयाच्या जवळ राहील असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31Yijfi