मुंबई- मधील माजी स्पर्धक अभिनेत्री हिने राहत्या घरी फिनाईल पिऊन करण्याचा प्रयत्न केला. चैत्राने दाक्षिणात्य सिनेमांत काम केले आहे. फिनाइल प्यायल्यानंतर तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर आहे. () दोन आठवड्यांपूर्वी झाले लग्न काही दिवसांपूर्वीच चैत्राने उद्योगपती नागार्जुन याच्याशी लग्न केले होते. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार चैत्रा लग्नानंतर आनंदी नव्हती. नागार्जुनच्या परिवाराने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला होता. तर याबाबत नागार्जुनने सांगितले की त्याने चैत्राबरोबर त्याच्या मर्जीने लग्न केले नव्हते तर जबरदस्ती तिच्याशी लग्न करून देण्यात आले. देवळात केले होते लग्न चैत्रा आणि नागार्जुन यांचे २८ मार्चला या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले. या दोघांनी गणपती मंदिरात लग्न केले. यावेळी त्यांच्या घरातील काही जवळचेन नातेवाईक उपस्थित होते. ते दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनमध्ये असल्याचीही चर्चा आहे. सासरच्यांनी घरात घेतले नाही पोलिसांनी चैत्राची जबानी घेतली असता तिने सांगितले, 'लग्नानंतर सासरच्या घरी गेली असता त्या लोकांनी घरात घेतले नाही. केवळ इतकेच नाही तर हे लग्नही त्यांना मान्य नाही असे सांगितले.' यावेळी नागार्जुन हा लग्नसाठी सातत्याने टाळाटाळ करत होता, असा आरोप चैत्राने तिच्या नवऱ्यावर केला. जीवे मारण्याची धमकी चैत्राने पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये नागार्जुनच्या घरच्यांनी तिला शिव्या दिल्या, तिच्या कामाला नावे ठेवली इतकेच नाही तर तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uDOuxc