Full Width(True/False)

कंगनाने पुन्हा एकदा उडवली महाराष्ट्रातील लॉकडाउनची थट्टा

मुंबई- महाराष्ट्रात सध्या वातावरण गंभीर आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्टात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी आणि महाराष्ट्रातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात १५ दिवसांचं घोषित करण्यात आलं आहे. परंतु, हे लॉकडाउन पाहून बॉलिवूड अभिनेत्री ने सरकारची थट्टा उडवली. कंगना नेहमीच महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत आली आहे. अनेक राजकीय मुद्द्यांवरदेखील तिने बिनधास्तपणे आपली मतं मांडली आहेत. आताही महाराष्ट्रातील निर्बंध पाहून तिने हटके पद्धतीने त्याची थट्टा उडवली आहे. कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर करत महाराष्ट्रातील लॉकडाउन बाबतीत तिचं मत व्यक्त केलं आहे. या फोटोत एका दाराला टाळं लावलं आहे. परंतु, त्या घराच्या भिंतीच गायब आहेत. तिने या फोटोची तुलना महाराष्ट्रातील लॉकडाउनशी केली आहे. या फोटोद्वारे तिने महाराष्ट्रातील लॉकडाउन कसा निरुपयोगी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नेटकरी या पोस्टची भरपूर मजा घेत आहेत. यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रियादेखील येत आहेत. एका युझरने कंगनाला पाठिंबा देत लिहिलं, 'असं वाटतंय, जोपर्यंत यांची खुर्ची जाणार नाही, तोपर्यंत ही ऐकणार नाही.' तर दुसऱ्या युजरने महाराष्ट्र सरकारला दोष देत लिहिलं, 'परिस्थिती गंभीरतेने हाताळली असती तर आज एवढे वाईट दिवस आले नसते.' इतरही अनेक युझर्सनी या परिस्थितीचं खापर महाराष्ट्र सरकारवर फोडत अत्यंत निष्काळजी सरकार म्हटलं आहे. महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात सध्या कलम- १४४ लागू केलं गेलं आहे. दरम्यान, कंगनाच्या चित्रपटांबद्दल सांगायचं तर, ती लवकरच 'तेजस' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरणही सुरु आहे. तर दुसरीकडे करोनामुळे 'थलाइवी' चं प्रदर्शन थांबवण्यात आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RE8MZ8