Full Width(True/False)

जंगल आपल्याला स्वतःची पातळी दाखवतं...विद्या बालननं शेअर केला शूटिंगचा अनुभव

० जगभरातील विविध देशांच्या तुलनेनं भारतात वन्यजीव संरक्षण आणि त्यांच्या देखभालीसाठी योग्य काळजी घेतली जाते का?- प्रत्येक देशासमोरील आव्हानं वेगवेगळी आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असली तरी आपण नक्कीच आपल्या परीनं दिवसागणिक वन्यजीव संरक्षण आणि त्यांच्या संवर्धनासाठी अग्रेसर होत आहोत. इतर बहुतांश देशांचा भूभाग हा मोठा आहे आणि त्यांची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे आपण तुलना करणं योग्य ठरणार नाही. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात वन्यजीवांच्या बाबतीतही विविधता आढळते. त्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक सर्वसामान्य लोकांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्व काम करत आहेत. कधी कधी काही दुर्दैवी घटनांमुळे वन्यजीवांच्या संरक्षणाला गालबोट लागतं. ० मध्य प्रदेशातील जंगलात चित्रीकरण करण्याचा अनुभव कसा होता?- इतर वेळी वातानुकिलित स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्यापेक्षा मोकळ्या हवेत, हिरवळीने वेढलेल्या आणि मोकळ्या आसमंता खाली काम करण्याचा अनुभव काही औरच होता. नेहमीच्या सोयी-सुविधा नसल्या तरी फार कशाची अडचण आली नाही. जंगल आपल्याला स्वतःमध्ये सामावून घेतं. पण, जंगल आपल्याला आपल्या स्वतःची पातळी दाखवतं. तसंच निसर्गाच्या मायेची उबदेखील देतं. आम्ही विशिष्ट कालमर्यादेतच जंगलात चित्रीकरणाचं काम करायचो. कारण, त्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर होता. आमच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी आम्ही अत्यंत नियोजन पद्धतीनं आणि शिस्तीत काम केलं. ० '' सिनेमा चित्रपटगृहा ऐवजी ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होतोय; याची खंत वाटते का?- अजिबात खंत वाटत नाही. आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी इतकीच आमची माफक अपेक्षा असते. आजच्या परिस्थितीत ओटीटी माध्यमांच्या सहाय्यानं अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतंय. आता 'शेरनी' हा सिनेमा एकाच वेळी २४० देशांमधील प्रेक्षकांसमोर येणार आहे. अडचणीच्या काळात कलाकृती त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्कीच शोधेल. ० चित्रपटगृहाची आठवण येते का?- हो, नक्कीच येते. मला विश्वास आहे की आपण या करोनाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा चित्रपटगृहात बसून सिनेमा पाहण्याचा आनंद लुटू. आता तर ओटीटीच्या निमित्तानं चित्रपट प्रदर्शनासाठी दोन माध्यमं तयार झाली आहेत. दोन्ही माध्यमं प्रेक्षकांचं मनोरंजन करतील आणि अधिकाधिक कलाकार, तंत्रज्ञ मंडळींना संधी उपलब्ध करुन देतील; किंबहुना आजही देत आहेत. ० दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- अमितनं दिग्दर्शित केलेला 'न्यूटन' हा सिनेमा मी पाहिला होता. या सिनेमानं मी प्रभावित झाले होते. त्यांचं दिग्दर्शन आणि गोष्ट सांगण्याची पद्धत मला अधिक भावली. अमित प्रेक्षकांना आपल्या गोष्टीत शिताफीनं गुंतवतात. गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोष्टीची प्रेक्षकांवरील पकड सुटत नाही. 'शेरनी' या सिनेमाचा विषय आणि कथा मी ऐकली तेव्हाच मला ती पसंत पडली आणि मी चटकन होकार दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RQYNjt