Full Width(True/False)

‘सलमानचं लग्न झालंय, त्याला मुलगी आहे!' भाईजाननं दिलं उत्तर

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्थात त्याच्या आगामी टायगर ३ या सिनेमासाठी जबरदस्त मेहनत घेत आहे. त्याचवेळेला सलमानने त्याचा भाऊ अरबाज खानच्या 'पिंच' च्या दुसऱ्या पर्वामध्ये हजेरी लावली. अरबाजचा हा एक टॉक शो आहे. यामध्ये तो येणाऱ्या कलाकारांना त्यांच्यावर सोशल मीडियावर होणारी स्तुती, केले जाणारे ट्रोलिंग यावरून रंजक असे प्रश्न विचारत असतो. या प्रश्नांना हे कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट उत्तरेही देतात. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय मनोरंजक आहे. अरबाजने त्याच्या 'पिंच' च्या दुसऱ्या पर्वातील भागामध्ये मोठा भाऊ सलमान खान प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले. या कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार अरबाजने त्याच्या भावाला, सलमानला देखील सोशल मीडियावर त्याच्यावर केलेल्या विविध कमेन्टवरून प्रश्न विचारले. यामध्ये एक प्रश्न असा होता की तो ऐकून सलमानदेखील हैराण झाला होता. काय होता प्रश्न अरबाजने सलमानला उद्देशून युझरने विचारलेला प्रश्नच विचारला. त्याने विचारले, 'अरे घाबरट माणसा कुठे लपून बसला आहेस तू.. भारतामध्ये सर्वांना माहिती आहे की दुबईमध्ये तुझी बायको नूर आणि १७ वर्षांची मुलगी आहे. भारतामधील लोकांना अजून किती काळ तू मूर्ख बनवणार आहेस.' हा प्रश्न नेमका कुणासाठी आहे, असा प्रश्न सलमानने अरबजाला विचारला. त्यावर अरबजाने त्याला सांगितले का हा प्रश्न तुलाच उद्देशून विचारला आहे. त्यावर सलमानने सांगितले, 'अरे या लोकांना तर सगळेच माहिती आहे.. परंतु या सर्व निरर्थक गोष्टी आहेत. मला याबद्दल काहीच माहिती नाही. हा प्रश्न ज्याने कुणी विचारला आहे आणि माझ्याकडून त्याला उत्तराची अपेक्षा आहे. त्याला मी फक्त एकच सांगतो की पूर्ण भारताला माहिती आहे की मी कुठे राहतो.' याच प्रश्नाला उत्तर देताना सलमान पुढे म्हणाला, 'अरे भावा माझी कुणी बायको नाही. मी भारतातच रहातो आहे आणि गेल्या नऊ वर्षांपासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे.' त्यानंतर अरबाजने आणखी एका युझरने केलेले ट्वीट वाचून दाखवले, त्या युझरने लिहिले की, ' सलमान खानचे घर म्हणजे अय्याशीचा अड्डा आहे...' त्यावर सलमानने उत्तर दिले की, 'तुम्ही माझ्या घरात असे काय पाहिले की माझे घर तुम्हाला अय्याशीचा अड्डा वाटले.' सलमानने आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत या कार्यक्रमाची लिंक ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे. म्हणून सलमानला पहिल्या पर्वात बोलावले नाही अरबाजच्या 'पिंच २' चे अनेक प्रोमो आले आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वामध्ये अनन्या पांडे, कियारा आडवाणी, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ, राजकुमार राव, फरहा खान, अनिल कपूर सहभागी होणार आहेत. अरबाजच्या मते त्याचा हा टॉक शो पहिल्या सिझनपेक्षाही मोठा होणार आहे. अरबाजच्या पहिल्या पर्वामध्ये सलमानला का बोलावले नव्हते, असे विचारले असता अरबाजने सांगितले की, माझा हा कार्यक्रम त्यातील वेगळेपणामुळे लोकप्रिय व्हावा. केवळ सलमान आल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळावी, असे मला वाटत नव्हते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zC5V3J