Full Width(True/False)

‘अजुनही बरसात आहे’ स्वीकारण्याची उमेश कामतची होती तीन ठोस कारणं

मुंबई : मराठी मनोरंजन सृष्टीतील गुणी अभिनेता म्हणून उमेश कामतने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. लवकरच उमेशचे छोट्या पडद्यावर आठ वर्षानंतर '' या मालिकेतून पुनरागमन होत आहे. मालिकेबद्दल उमेश खूपच उत्साहित आहे. या सगळ्याबद्दल उमेश टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने बोलला आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम करण्याचा अनुभवही त्याने या मुलाखतीमधून सांगितला. काय म्हणाला उमेश आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्याचा अनुभव कसा आहे, असे उमेशला विचारले असता तो म्हणाला, 'मी कामाबद्दल अतिशय चोखंदळ आहे. आठ वर्षांपूर्वी 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या टीव्ही मालिकेत काम केले होते आणि त्यानंतर आता या मालिकेत काम करणार आहे. माझ्या मते टीव्ही मालिकांमध्ये काम करताना त्यात तुम्ही संपूर्णपणे झोकून देऊन काम करण्याची गरज असते. येथे काम करताना तुमचा दिवस, रात्र त्यासाठी द्यावा लागतो. या सगळ्यासाठी तुमची मानसिक तयारी असावी लागते. ‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेत काम करण्यासाठी माझी स्वतःची अशी काही ठोस कारणे आहेत,’ असे उमेशने सांगितले. या कारणांमुळे मालिका करण्याचा घेतला निर्णय ही कारणे कोणती असे विचारल्यावर उमेशने सांगितले, ‘सर्वप्रथम ही मालिका मी स्वीकारली ती निर्मिती संस्थेमुळे आणि दुसरे कारणे आहे ती या मालिकेत नायिकेची भूमिका साकारणाऱ्या आणि तिसरे कारण आहे ते म्हणजे माझे असंख्य चाहते आणि सोनी वाहिनी. गेल्या काही वर्षांपासून मी छोट्या पडद्यावर काम करावे, अशी मागणी सातत्याने माझे चाहते करत आहेत. त्यांनी तसेच मेसेज मला पाठवले होते. त्याबरोबरच माझ्या मनानेदेखील ही भूमिका तू करायला हवी, असा कौल दिला होता. या सगळ्या गोष्टींचा मी गंभीरपणे विचार केला. त्यातून ‘अजूनही बरसात आहे’या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करण्याचा निर्णय मी घेतला,’ असे त्याने सांगितले. प्रेक्षकांशी संवाद साधला जातो ‘अजुनही बरसात आहे’ ही मालिका निवडण्याचे काय कारणं आहेत, असे उमेशला विचारले. त्यावर तो म्हणाला, ‘ मी मनोरंजन विश्वामध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये मी काम केले आहे. आतापर्यंत जाहिराती, ओटीटी प्लॅटफॉर्मवर, नाटक आणि टीव्ही अशा वेगवेगळ्या माध्यमात काम केले. या प्रत्येक माध्यमात काम करण्याचा अनुभव वेगळा असतो, या प्रत्येक माध्यमाच्या गरजाही वेगळ्या आहेत. परंतु सगळ्या माध्यमात काम करताना कठोर मेहनत आणि तालीम करणे आवश्यकच असते. तुम्ही किती समरसून, मेहनत घेऊन काम करता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मला असे वाटते की टीव्ही मालिका या जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. त्यामुळे अशा प्रकारचे काम तुम्ही अधूनमधून करायला हवे. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांशी जोडले जातात. त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्याचा कलाकार म्हणून तुम्हाला नक्कीच फायदा होतो. मला आनंद आहे ही संधी मला ‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेमुळे मिळाली आहे. चाहत्यांकडून मिळतोय भरभरून प्रतिसाद ‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेचा टीझर आणि प्रोमो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. ही मालिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या सर्वाबद्दल उमेशने सांगितले, ‘ जेव्हा या मालिकेचा प्रोमो आणि टीझर रिलीज झाला. तेव्हापासून मला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझाच नाही तर आमच्या संपूर्ण टीमचा उत्साह खूपच वाढला आहे. आमचे चाहते मुक्ताला आणि मला या मालिकेत एकत्र काम करताना पाहण्यासाठी खूप उत्सुकतेने वाट बघत आहेत. तेच नाही तर आम्ही दोघेदेखील चाहत्यांइतकेच उत्सुक आहोत.’ उमेशने पुढे सांगितले, ‘माझी आणि मुक्ताची पहिली भेट लुक टेस्टवेळी झाली. खूप वर्षांनंतर आम्ही एकमेकांना भेटल्याचा प्रचंड आनंद आम्हा दोघांनाही झाला होता. इतकेच नाही तर आम्ही दोघेजण या मालिकेत एकत्र काम करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. अनेक वर्षांपासून आम्हाला एकत्र काम करण्याची इच्छा होती. आमची ही इच्छा आदी आणि मीराच्या रूपाने पूर्ण होत असल्याचा खूप आनंद आहे. ’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qFZnO8