Full Width(True/False)

नवरी नटली, पण लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार?

मुंबई :'' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला वेध लागले आहेत ते तिच्या आणि अनिरुद्धच्या लग्नाचे. ३० ऑगस्ट या दिवशी ते लग्न करणार आहेत. अनिरुद्धबरोबर लग्नगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं संजनाचं स्वप्न पूर्ण होणार का याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या लग्नाच्या निमित्तानं नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक समोर आला आहे. मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे लग्नासाठीही तिनं खास तयारी केलीय. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे. आता या दोघांचं लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BjueEp