Full Width(True/False)

'क्राइम पट्रोल'साठी होकार देताना काय विचार केला होता? रेणुका शहाणे म्हणतात...

संपदा जोशी ० '' या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन करण्याचा अनुभव कसा आहे?- उत्तम अनुभव आहे. प्रत्येक वेळी विषयाच्या अनुषंगाने सूत्रसंचालनाची संहिता बदलावी लागते. गांभीर्यानं आणि सामंजस्यानं काम करायचंय. मला पालकांबरोबर संवादही साधायचाय. त्यामुळे मी त्यांना त्यांच्यातली एक वाटायला हवी, असं काम करण्याचा मी प्रयत्न करतेय. ० कार्यक्रमासाठी होकार देताना काय विचार केला होता?- हा कार्यक्रम मी आधीपासूनच बघते. मला असं काम स्वीकारायला आवडतं जिथे मी स्वतःला पाहू शकेन. कार्यक्रमाची थीम 'गुमराह बचपन' असल्यानं त्यांनी मला मी पालक आहे या अनुषंगानेच विचारलं आणि तो विचार मला पटला. म्हणून मी होकार दिला. ० 'त्रिभंग' या चित्रपटानंतर पुढचा चित्रपट कधी आणि कोणता?- मी पुढच्या चित्रपटाची पटकथा लिहितेय. कोणत्याही चित्रपटाचा कणा त्याची संहिता असते. त्यामुळे संहितेवर काम करायला वेळ लागतो. त्यावर सध्या काम सुरू आहे. ० उत्तम लेखन आणि दिग्दर्शन करत असताना आता अभिनयाकडेही पुन्हा वळणार का?- दोन तासांच्या चित्रपटासाठी पडद्यामागे खूप काम करावं लागतं, हे दिग्दर्शन करताना समजतंय. त्यामुळे गेली ७ वर्ष 'त्रिभंग' चित्रपटावरच काम करत होते. तेव्हा दुसरं काहीच स्वीकारलं नव्हतं. पण आता इतरही कामं करायला लागले आहे. आता कॅमेरासमोरदेखील जास्त दिसेन. ० मालिका करण्याचा काही विचार?- नाही. कोणत्याही भाषेत मालिका करण्याचा विचार नाही. तिथे ज्या पद्धतीचं काम लागतं ते माझ्या स्वभावाला पटत नाही. पण मालिका करणाऱ्या कलाकारांविषयी मला खूप आदर आहे. मी कोणतीही गोष्ट स्वीकारताना गोष्टीची सुरुवात, मध्य आणि शेवट बघते. मालिकेला मी न्याय देऊ शकणार नाही, असं मला वाटतं. ० ओटीटीवर (ओव्हर द टॉप) काम करण्याचा अनुभव कसा होता?- ओटीटीवर काहीतरी वेगळं मांडता येतं. त्या माध्यमावर जगभरातले वेगवेगळे विषय बघायला मिळतात. माझ्यातल्या क्रिएटिव्ह कलाकाराला कुठेही धक्का लागला नाही, याचा आनंद वाटतो. 'त्रिभंग'सारखा चित्रपट ओटीटीसाठीच योग्य आहे. सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असता तर काही समस्या येऊ शकल्या असत्या. ० सिनेमागृहं बंद असल्यानं चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताहेत, याचा काही तोटा वाटतो का?- काही चित्रपट बघण्याचा आनंद हा सिनेमागृहांमध्ये जाऊनच घ्यायचा असतो. असे चित्रपटही ओटीटीवर येत असतील तर ते त्या चित्रपटांसाठी हानिकारक आहे. पण करोनामुळे सिनेमागृहांत जाणं शक्य नाही हेही तितकंच खरं. ० मानसिक आरोग्याची काळजी कशी घेता?- आयुष्याकडून माझ्या अपेक्षा खूप कमी आहेत. माझा परिवार माझी ताकद आहे. त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मला खूप आवडतं. त्यामुळेच मानसिक संतुलन मी राखू शकते. माझ्या मुलांशी माझं मैत्रीचं नातं आहे. नवरा आणि इतर कुटुंबीयांशीही घट्ट नातं आहे. याच गोष्टींमुळे मानसिक आरोग्य जपायला मदत होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hWdv2L