मुंबई: ‘’ आगामी मालिकेची चर्चा आहे. वेगळी पटकथा आणि प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता आहे. श्रद्धेचं अवडंबर न माजवता भक्‍ती करण्यामागचा विचार आणि तुम्‍ही कशाप्रकारे मानसिक शांती आणि समाधान मिळवू शकता, याबाबत मालिकेत भाष्य करण्यात येणार आहे. मालिकेची कथा अभिनेत्री हिनं साकारलेली सविता ही भूमिका; तसंच रतलाम येथील तिचं कुटुंब यांच्याभोवती फिरते. या मालिकेत लक्ष्‍मीदेवीची भूमिका साकारणार आहे. तनिषा मेहता, मितिल जैन, मनन जोशी, माही शर्मा यांच्याही मालिकेत भूमिका आहेत. भक्तीचं अवडंबर आणि स्वतःला बदलण्याचा प्रवास या विषयाचे विविध पैलू यातून रसिकांसमोर येणार आहेत. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी गीतांजली ही देवभोळी दाखवली आहे. आपल्या कुटुंबाला संकटातून वाचवण्‍यासाठी ती देवी लक्ष्‍मीची भक्ती करत असते. जेव्हा सविताचा आत्मविश्वास आणि परिवर्तनाबाबत जागृत करण्यासाठी देवी तिच्यासमोर येते, तेव्हा कथेला वळण मिळतं. दीपक दत्ता, राहुल सिंग, आफरिन अल्‍वी, पूनम सरनाईक हे टीव्ही कलावंतही मालिकेत दिसणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yR7H00