मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता नबाब खानदानातील आहे. त्याचा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा त्याच्या पतौडी पॅलेसचा उल्लेख येतो. सैफ अली खान अनेकदा त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत या राजमहालात सुट्ट्या घालवण्यासाठी जातो. या राजमहालात अनेक सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे. काही दिवसांपासून सैफने त्याच्या या महालासाठी ८०० कोटी रुपये दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्याला याबाबत विचारले असता त्याने सविस्तर खुलासा केला आहे. सैफला एका मुलाखतीमध्ये त्याने त्यांचा खानदानी पुन्हा विकत घेतला का असा प्रश्न विचारला. त्यावर सैफ म्हणाला, 'मी तो पुन्हा विकत घेतलेला नाही. तर त्याचे लीज भरले आहे.' सैफने पुढे सांगितले की, 'हे पैसे देणे माझ्यासाठी, सोपे नव्हते. तो माझा विशेषाधिकारच आहे.' याआधीही सैफने याबाबत मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'माझ्या आजी-आजोबांनी हा महाल १०० वर्षांपूर्वी बांधला होता. ते त्यावेळचे राज्यकर्ते होते. परंतु त्यानंतर ही संस्थाने खालसा झाली. त्यावेळची परिस्थिती पाहून माझ्या वडिलांनी हा महाल भाड्याने दिला.' 'फ्रांसिस आणि अमन यांनी या महालात एक हॉटेल सुरू केले आणि सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घेतली. ते आमच्या कुटुंबातीलच एक झाले आहेत. माझी आई, शर्मिला टागोरचे येथे एक कॉटेज आहे. तिथे ती आरामात रहाते. ही सर्व प्रॉपर्टी नीमराना हॉटेलला लीजवर दिली होती. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी मी परत घेण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा मी हे लीज संपवले आणि पैसे देऊन घराचा ताबा परत घेतला.' सैफ अली खानच्या कामाबद्दल सांगायचे तर तो सध्या त्याच्या आगामी 'भूत पुलिस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l0wbPp