मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यांनी नुकतीच '' मध्ये हजेरी लावली होती. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची जोडी प्रेक्षकांची आवडती होती. ऋषी यांच्या निधनानंतर नीतू यांनी आपल्या कुटुंबाचा डोलारा समर्थपणे पेलला. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या नीतू यांनी 'कपिल शर्मा शो' मध्ये असं काही म्हटलं ज्यामुळे तिथे उपस्थित सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. कपूर खानदानाला खोटा अहंकार आहे असं नीतू यांनी म्हटल्यावर देखील त्यांच्याकडे पाहतच राहिला. वाहिनीतर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये नीतू त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर सोबत कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यात कपिल आणि नीतू कपूर खानदानाबद्दल चर्चा करताना दिसतायत. कपिलच्या एका वक्तव्यावर उत्तर देताना नीतू म्हणतात, 'कपूर कुटुंबीयांचा ना एक खोटा अहंकार आहे, कपूर अहंकार. वरून सगळेच अगदी रुबाबदार आणि कडक असल्याचं दाखवतात पण आतून सगळेच नेभळट आणि लल्लू आहेत.' आपल्या आईचे हे बोल ऐकून रिद्धिमा देखील चकीत होते. तर कपिल आणि अर्चना पूरन सिंह जोर जोरात हसू लागतात. आणखी एका प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे कपिल ऋषी आणि नीतू यांची एक आठवण सांगतो. कपिल म्हणतो, '२०१७ मध्ये ऋषीजींना कार्यक्रमात बोलावण्यासाठी मी त्यांना फोन केला. त्यांनी होकार दिला पण त्यांना तुम्ही नीतूजींना देखील सोबत घेऊन या हे सांगायची कुणाचीही हिम्मत होत नव्हती. मी अखेर त्यांना म्हणालो, तुम्ही नीतूजींना देखील सांगा. त्यावर ऋषीजी मला म्हणाले, 'मग तिला फोन कर ना मला कशाला फोन करतो?' मग मी नीतूजींना रात्री १० वाजता फोन करून विचारलं, तुमचे पती तुमच्या सोबत नाहीयेत का? त्यावर त्या म्हणाल्या, माझा नवरा रात्री १० वाजता माझ्यासोबत नसेल तर कुठे असेल?' २०१७ साली ऋषी यांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gYGmTm