Full Width(True/False)

तुम्हाला काही अक्कल आहे का? घटस्फोटाच्या चर्चांवर भडकली सामंथा अक्किनेनी

मुंबई- लोकप्रिय तेलगू अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच सामंथा 'द फॅमिली मॅन २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सामंथाने वेबसीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने सामंथाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. परंतु, सामंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. सामंथा आणि दाक्षिणात्य अभिनेता यांची जोडी चाहत्यांची प्रचंड आवडती जोडी आहे. परंतु, सध्या या जोडीत सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. त्यांचं नातं सध्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत. सामंथाने घटस्फोटाच्या चर्चांवर आता प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच सामंथाला तिरुमाला मंदिराच्या बाहेर पाहिलं गेलं. मंदिरातून बाहेर निघाल्यावर पत्रकारांनी तिच्याभोवती गर्दी केली. त्यात एकाने सामंथाला तिच्या आणि नागा चैतन्याच्या घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर सामंथा नाराज दिसून आली. तिने प्रतिक्रिया देत रागात तेलगू भाषेत म्हटलं, 'गुडिकि वंचनु, बुद्धि उंडा.' म्हणजेच तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? मी इथे मंदिरात आली आहे आणि तुम्ही मला हे प्रश्न विचारताय. तिने पत्रकारांना फटकारलं असलं तरीही घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला नाही. घटस्फोट होणार की नाही याबद्दल तिने एक अक्षरही न काढल्याने चाहत्यांच्या मनात अजूनही गोंधळ आहे. सामंथाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे आडनाव काढून टाकल्याने सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. २०१४ मधील 'ऑटोनगर सूर्या' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांमधील जवळीक वाढली होती. २०१७ साली सामंथा आणि नागा चैतन्य यांनी गोवा येथे थाटामाटात लग्न केलं. चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या या जोडीच्या घटस्फोटाच्या चर्चा ऐकून चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o1jSWn