मुंबई :काही वर्षांपूर्वी आलेला '' हा चित्रपट आठवतोय? अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडेचा हा चित्रपट अक्कलकोटचे 'श्री स्वामी समर्थ' महाराज यांच्या भक्तीवर आधारित होता. या चित्रपटाला चांगलं यश मिळालं होतं. आता या चित्रपटाला सिक्वेल येणार आहे. पाच वर्षांनंतर प्रवीण तरडेनं 'देऊळ बंद'च्या सिक्वेलची घोषणा केली असून, लवकरच '' असं नाव असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१५ साली आलेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि मुख्य भूमिकेत झळकले होते. अनेक चित्रपटांचे सिक्वेल येत असताना या चित्रपटाचाही सिक्वेल यायला हवा अशी प्रेक्षकांची इच्छा होती. आता या नव्या चित्रपटाविषयीही प्रेक्षकांना तेवढीच उत्सुकता असेल. 'वटवृक्ष' एन्टरटेन्मेंट' या बॅनरखाली सौ. जयश्री कैलास वाणी आणि जुईली कैलास वाणी यांची निर्मिती आणि गणेश निबे प्रॉडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटामध्ये मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारली होती. स्वामी समर्थांच्या गेटअप मधील त्यांचा लूक प्रदर्शित केल्यानंतर जोशींना पाहून पहिल्यांदा सगळेच अवाक् झाले होते. त्यांच्या मेकअपचे अवघड आव्हान महेश बराटे यांनी लीलया पेलल्याचे लुक वरून दिसून आले होते. स्वामीसमर्थांच्या अवतारातीलमोहन जोशींची सशक्त अभिनय क्षमता, जरब असलेली संवाद फेक, बोलण्याची खास शैली यांमुळे त्यांची निवड केल्याचे प्रवीण-प्रणीत यांनी सांगितलं होतं. ‘देऊळ बंद’ या सिनेमासाठी प्रणित कुलकर्णी यांनी लेखक, दिग्दर्शक आणि गीतलेखकाची जबाबदारी सांभाळली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2O302H2