Full Width(True/False)

CBI रिया चक्रवर्तीला का अटक करत नाही, इथे अडलंय घोडं!

मुंबई- प्रकरणात , ईडी आणि आता नारकोटिक्स ब्युरोची चौकशी सुरू आहे. सीबीआयने मुंबईत चौकशी सुरू केल्यानंतर आठव्या दिवशी या प्रकरणाची मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची चौकशी केली. रविवारीपर्यंत सलग तीन दिवस तिची चौकशी करण्यात आली. आज सोमवारी चौथ्या दिवशीही रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. सीबीआयने तीन दिवसांमध्ये रियाची जवळपास २६ तास चौकशी केली आहे. यादरम्यान, अनेकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे रिया चक्रवर्तीला अद्याप अटक का केली जात नाही? सुशांतचे कुटुंबिय आणि त्याचे चाहते करत आहेत रियाच्या अटकेची मागणी सुशांत प्रकरणात त्याच्या मृत्यूनंतर लगेचच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली. याआधी मुंबई पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलिसांनी कोणताही एफआयआर दाखल केली नाही तसेच कोणालाही अटक केले नाही यावरही प्रश्न विचारण्यात आले. अशात जेव्हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला तेव्हा सुशांतच्या कुटुंबियांपासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत साऱ्यांनाच वाटलं की आता रियाला अटक केली जाईल. परंतु तपास सुरू होऊन १० दिवस झाले तरी तसं काही झालं नाही. पण असं का हाच प्रश्न आहे. प्रकरणाची पकड सैल व्हावी असं सीबीआयला मुळीच वाटत नाही रियाच्या अटकेत अनेक पेच आहेत. त्यामुळे घाईघाईत रियाला अटक करावी आणि नंतर पुराव्याअभावी तात्काळ जामीन मिळावा असं सीबीआयला मुळीच वाटत नाही. यामुळे प्रकरणावरची पकड सैल होईल. यासोबतच या प्रकरणात अनेक संभ्रमही आहेत. याचमुळे रियाला अटक करता येत नाही. नक्की हा गोंधळ काय आहे ते जाणून घेऊ.. १. अहवालात असं दिसून आलं की रियाविरूद्ध सीबीआयला अद्याप कोणतेही ठाम आणि खात्रीलायक असे पुरावे सापडलेले नाहीत. आत्महत्या आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतच्या वडिलांच्या एफआयआरमध्येही रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. २. सीबीआयने आतापर्यंत बर्‍याच लोकांची चौकशी केली आहे. सिद्धार्थ पिठाणीपासून सुशांतचा स्वयंपाकी नीरजचीही चौकशी केली आहे. यात पहिली मोठी समस्या ही आहे की साक्षीदार सतत त्यांचे जबाब बदलत आहेत. १३ आणि १४ जून रोजी जे घडलं त्यात नीरज, सिद्धार्थ पिठानी, केशव आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या जबाबात फरक आहे. ते सर्व एकाच घटनेचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख करत आहेत. यातलं नक्की कोण खरं बोलत आहे याचा तपास करणं सीबीआयसाठी कठीण जात आहे. ३. कोणता साक्षीदार खरं बोलत आहे आणि कोणता साक्षीदार खोटं बोलत आहे हे शोधून काढणंही एक मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत बहुतेक वेळा पॉलीग्राफ चाचणी केली जाते. सीबीआय रियाची पॉलीग्राफ चाचणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु तरीही तिच्याविरूद्ध साक्ष गोळा करणं कठीण होत आहे. ४ रियाच्या अटकेसाठी सीबीआयचं सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे सुशांतची अटोप्सी, विसरा आणि फॉरेन्सिक तपासाचा अहवाल. सीबीआयने सुशांतच्या घरी क्राइम सीन रिक्रिएट केला आहे. अशा परिस्थितीत फॉरेन्सिक तपासात रियाविरुद्ध काही पुरावे सापडले तर तिला तात्काळ अटक होऊ शकते. परंतु यातही अडचण अशी आहे की हे प्रकरण बऱ्याच उशिराने सीबीआयकडे सोपविण्यात आल्याने सुशांतच्या अ‍ॅटॉपी, विसरा आणि फॉरेन्सिक तपासणी अहवालावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ५. स्पष्ट सांगायचं तर रियाच्या अटकेसाठी सीबीआयकडे सर्वात प्रबळ पुरावा हा फॉरेन्सिक रिपोर्टच आहे. एम्सची टीम याचा शोध घेत आहे. सोमवारी एम्सची फॉरेन्सिक टीम कूपर इस्पितळातील डॉक्टरांशीही बोलणार आहे. याच डॉक्टरांनी सुशांतच्या अटोप्सी आणि विसराची तपासणी केली होती ६. आत्महत्या आणि खून प्रकरणातील सीबीआयचा ट्रॅक रेकॉर्डदेखील येथे एक मोठं कारण आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सीबीआयने ज्याजेवढ्या आत्महत्या आणि खून प्रकरणाचा तपास केला त्या सर्व प्रकरणांमध्ये क्वचितच मुख्य आरोपीला न्यायालयात दोषी ठरविण्यात आलं आहे. ७. सीबीआयकडे रियाचे फोन रेकॉर्ड, बँक स्टेटमेन्ट आणि महत्त्वपूर्ण अशी सर्व कागदपत्रं आहेत. पण रियाला ताबडतोब अटक करता येईल असा एकही पुरावा अद्याप मिळालेला नाही. असं असलं तरी ड्रग्ज चॅटचं प्रकरण रियावर भारी पडू शकतं. पण हे प्रकरण नारकोटिक्स ब्युरोचं आहे. या प्रकरणात रियाला अटक केली तरी ती नारकोटिक्स ब्युरो करेल. सीबीआय नाही. ८. एनसीबीच्या टीमने गुरुवारी मुंबई गाठली आणि शुक्रवारी सीबीआयने रियाला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावलं. आता सीबीआयला हे देखील समजलं आहे की एनसीबीचं प्रकरण अधिक मजबूत आहे. अशा परिस्थितीत एनसीबीने रियाला प्रथम बोलावून पुराव्यानिशी अटक केली असती तर सीबीआयला पुढील तपासात अडचणी आल्या असत्या. याचमुळे सध्या सीबीआयकडून रियाची सतत चौकशी केली जात आहे. ९. रियाचे सर्व ड्रग चॅट ईडीने नारकोटिक्स ब्युरोला दिले आहेत. यात ईडीने कथित ड्रग डीलर गौरव आर्याचीही चौकशी केली. ईडीनंतर एनसीबीही गौरवची चौकशी करेल. या सगळ्यात रियाला अटक करण्याची चार मुख्य कारणं एनसीबीकडे आहेत. अवैधरित्या ड्रग्ज घेणं, अवैध्यरित्या ड्रग्ज दुसऱ्याला देणं, अवैधअयरित्या ड्रग्ज विकत घेणं आणि ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असणं. यातील कोणत्याही घटनांमध्ये पुरावा आढळल्यास एनसीबी करू शकते हे जवळपास निश्चित आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jyNPrf