Full Width(True/False)

इथे साले सगळेच भ्रष्ट आहेत.... शशांक केतकरचा पोस्टमधून हल्लाबोल

मुंबई:गेल्या शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री हिच्या मुंबईतील कार्यालयावर अखेर काल हातोडा पडला .पाली हिल इथं असलेल्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली आहे. यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.काही जणांनी कंगनाची बाजू घेत सुड घेण्याच्या हेतून पालिकेनं कारवाई केल्याचं म्हटलं तर, अनेकांनी पालिकेच्या कारवाईत काहीही चुकलं नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाचा संदर्भ घेऊन मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता यानं पोस्ट लिहित सरकारवर आणि एकंदर प्रशासकीय यंत्रणेवर निशाणा साधला आहे. कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर तडकाफडकी कारवाई करण्यात आल्यानं शशांकनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. काय लिहिलं आहे शशांकनं? कंगना राणावत याचं ऑफिस अनधिकृत? असेलही... पण मग ते पूर्ण होई पर्यंत का थांबले होते सगळे ? आधी परवानग्या कोणी दिल्या? माझा कुठल्याही एका पक्षावर आरोप नाही, किंवा समर्थनही कोणालाच नाही कारण इथे सगळेच साले भ्रष्ट आहेत. झोपडपट्ट्या वाढतायत, रस्त्यावर खड्डे पडतात, पूल पडतायत, नाले वाहतायत, अनधिकृत उंचच उंच टॉवर्स उभे राहतायत, कोरॉना आहेच आणि वाढतोय, श्रीमंत अधिक श्रीमंत होतायत... गरीब आणखी गरीब. ही पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश वेगळा आहे. मी एका अत्यंत सर्व सामान्य घरातला मुलगा आहे. मी २०१३ मध्ये मिरा रोडइथं RNA Viva नावाच्या एका कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट घेतला आहे. जो आज २०२०मध्ये सुद्धा तशाच अपूर्ण अवस्थेत आहे आणि आणखी किती वर्ष असाच असेल याची काही नाही. मला रीतसर बॅंकेचं कर्ज मिळाले आहे. माझी सगळी कागदपत्र पूर्ण आहेत, तरीही फक्त भ्रष्ट बिल्डर मुळे आणि राजकीय युद्धामुळे आम्ही सगळे घर मालक हातावर हात धरून गेली सात वर्ष बसून आहोत. आता त्या कॉम्प्लेक्सला प्रशासनाकडून टाळं ठोकण्यात आलं आहे आणि ते कॉम्प्लेक्स वादात अडकलं आहे. माझा मुद्दा हा आहे की आम्हा सामान्य नागरिकांचे पैसे वापरून हे असे रोज घोटाळे केले जातात. फक्त मुंबईत नाही तर देशभर! मला मुंबई चा अभिमान आहे पण मुंबईतच असे हजारो अडकलेले कॉम्प्लेक्स असतील... ते सगळे पाडून आमचे पैसे आम्हाला परत मिळतील का? यात नेमकी कुणा कुणाची पोटं भरतायत? आमच्या मागे खरंच कुठलाच राजकीय पाठिंबा नाहीये, मग आमचं काय ? आणि फक्त हे घोटाळे नाहीत तर साधं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला रोज संघर्ष करावा लागतोय त्या फसवणूकीचं काय? कृपा करून... तुम्ही तर अभिनेते आहात तुम्हाला काय कमी आहे वगैरे उथळ कॉमेंट्स करू नका. मुद्दा समजून घ्या. फक्त मुंबई चा नाही तर मला आपल्या देशाचा अभिमान आहे पण जेव्हा पदोपदी जगण्याची आणि टीकून राहण्याची भीती वाटायला लागते तेव्हा ? अगदी बलाढ्य देशांमध्ये सुद्धा भ्रष्टाचारआहे, राजकारही चालतच, पण सर्व सामान्यांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. आपल्याकडे ?सध्याची ( सुशांत प्रकरणामुळे चालू झालेलं राजकारण) राजकीय परिस्थिती पाहता माझ्या सारख्या सामान्य माणसाचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत असं दिसतंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k3AAPn