Full Width(True/False)

वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात

मुंबई- लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाचा सामना करत असलेला सिनेनिर्माता गुरुवारी चौकशीसाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला. अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात अनेक खळबळजनक आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला समन्स बजावला होता. आज अनुरागला सकाळी ११ वाजता ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं. चौकशीसाठी तो वेळेच्या आधीच पोहोचला होता. अनुरागचा जबाब नोंंदवला जाईल अनुराग कश्यपची सध्या चौकशी सुरू असून या काळात त्याचा जबाबही नोंदवून घेतला जाईल. अनुरागसोबत त्याचे वकीलही पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. एकीकडे पायल अनुरागच्या अटकेची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे अनुरागने त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याच्या वकिलांना यासंदर्भातलं अधिकृत स्पष्टीकरणंही दिलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला. तिची आणि अनुरागची मैत्री फेसबुकवर झाल्याचं सांगितलं. त्यानंतर ती अनुरागला भेटली. तिसर्‍या भेटीत अनुरागने तिला घरी बोलावलं आणि यावेळी त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असं अभिनेत्रीने सांगितलं होतं. अनुराग कश्यपने घरी बोलावण्यासाठी अभिनेत्रीला अनेक फोन केल्याचंही ती म्हणाली. पायल घोषने राज्यपालांचीही घेतली भेट या प्रकरणात अभिनेत्री पायल घोषने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांचीही भेट घेतली. या भेटीवेळी तिच्यासोबत आरपीआय नेते रामदास आठवले होते. आठवले यांनी अभिनेत्रीचं समर्थन केलं असून दोघांनी पत्रकार परिषदही घेतली होती. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पायलने माध्यमांना सांगितलं की तिला सहकार्य करण्याचं आश्वासन राज्यपालांनी दिलं आहे. या प्रकरणात अभिनेत्रीने राज्यपालांकडे अनुराग कश्यपला अटक करण्याचं आवाहन केलं होतं. अटक केली नाही तर उपोषण पायल घोषने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की, जर अनुरागला अटक केली नाही तर ती उपोषणाला बसेल. इतकंच नाही तर तिच्या जीवाला धोका असल्याचंही अभिनेत्रीने म्हटलं होतं. याचसाठी तिने केंद्र सरकारकडे व्हाय वर्गाच्या संरक्षणाची मागणी केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ERUJsW