Full Width(True/False)

आर्यन- नीसा देवगण एकत्र पळून गेले तर? शाहरुखने दिलं मजेशीर उत्तर

मुंबई- बॉलिवूडमधली हिट जोडी म्हणून आजही आणि यांच्याकडे पाहिलं जातं. पडद्यावरच्या केमिस्ट्रीपेक्षा ते पडद्यामागे अर्थात खऱ्या आयुष्यात अधिक चांगले मित्र आहेत. एकदा करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये काजोलला करणने विचित्र प्रश्न विचारून गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला. काजोलची मुलगी देवगण आणि शाहरुखचा मुलगा दोघं पळून गेले तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? करणच्या या प्रश्नावर काजोलने मजेशीर उत्तर दिलं. काजोल आणि शाहरुखच्या उत्तरावर राणी मुखर्जीही हसली या प्रश्नावर काजोलने 'दिलवाले दुल्हे ले जाएंगे' असं मजेशीर उत्तर दिलं. फक्त काजोलच नाही तर शाहरुखनेही या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मला तर हा किस्सा नीट कळला नाही. पण जर काजोल माझी नातेवाईक झाली तर मी सतत घाबरून राहीन. शाहरुखच्या या बोलण्यावर राणी मुखर्जीही मनमुरादपणे हसली. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ला २५ वर्षे पूर्ण झाली शाहरुख- काजोलच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला आज (२० ऑक्टोबर) २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २० ऑक्टोबर १९९५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. काजोलने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, तिला सिमरन कूल वाटते पण त्यासोबतच ती थोडी जुन्या पद्धतीचीही होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kgu8oD