Full Width(True/False)

आशुतोष राणा यांनी कविता ऐकवून जिंकलं होतं रेणुका शहाणे यांचं मन

मुंबई- आणि हे बॉलिवूडमधील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांची लव्हस्टोरीही फार रंजक आहे. आपल्या एका मुलाखतीत अभिनेते आशुतोष राणा म्हणाले होते की पत्नी रेणुका यांच्यामुळेच ते सिनेसृष्टीत आज इतके यशस्वी आहेत. आज आशुतोष यांच्या वाढदिवसानिमित्त दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊ.. हंसल मेहता यांच्या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. हा सिनेमा पूर्ण झाला नाही पण यामुळे रेणुका आणि आशुतोष यांना एकमेकांची आयुष्यभराची साथ मिळाली. आशुतोष यांना रेणुकासोबत मैत्री करणं तेवढं सोप्प नव्हतं. त्यांचा फोन नंबर घेण्यासाठीही त्यांना बराच घाम गाळावा लागला होता. पण रेणुका यांना फोन करण्यासाठीच्याही काही अटी होत्या. त्या अनोळखी व्यक्तीचे फोन उचलत नाहीत आणि रात्री १० नंतरही त्या कोणाचेही फोन उचलत उचलायच्या नाहीत. याचमुळे आशुतोष यांनी रेणुका यांना मेसेज पाठवला. विशेष म्हणजे रेणुका यांनी आशुतोष यांच्या मेसेजला उत्तरही दिलं. दोघेही जवळपास तीन महिने फोनवर बोलले. यानंतर आशुतोष राणा यांनी त्यांचं लेखन कौशल्य वापरून रेणुका यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक कविता लिहून रेणुका यांना सादर केली. रेणुका यांना ही कविता इतकी आवडली की त्यांनीही आशुतोष यांच्याकडे आपलं मन मोकळं केलं. दोघांनी आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आणि २००१ मध्ये दोघांचं लग्न झालं. आजही दोघं एकमेकांच्या प्रेमाबद्दल मोकळेपणाने बोलतात आणि एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आशुतोष राणा यांचे आगामी सिनेमे आशुतोष राणा यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात १९९६ पासून केली. त्यांनी हासिल, दुश्मन, जख्म, संघर्ष, कुसूर, गुनाह, कर्ज, एलओसी कारगिल, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, डर्टी पॉलिटिक्स, ब्रदर्स और मुल्क सारख्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण काम केलं. सध्या आशुतोष राणा यांचे चार बिग बजेट सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. शमशेरा, हंगामा 2, पगलैट आणि पृथ्वीराज हे चार सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38uhcsb