मुंबई- २०२० या वर्षापासून अनेकांना फार अपेक्षा होत्या. पण या वर्षाने निराशाच जास्त केली. २०२० च्या सुरुवातीला अनेकांनी आशा- अपेक्षांची मोठी यादीच तयार केली होती. पण अचानक करोनाचा काळ सुरू झाला आणि पत्याच्या घर कोसळावं तसं अनेकांचं स्वप्न भंगलं. यावर्षी बर्याच लोकांनी त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण द्यायचा निर्णय घेतला होता. पण आणि लॉकडाउनमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. अनेकांनी लॉकडाउनची संधी साधून लग्न केलं तर काहींनी लग्न करण्याचा निर्णय पुढेच ढकलला. या वर्षी काही दोनाचे चार हात करण्याच्या तयारीत होते, पण त्यांनी विचार बदलला. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत. अर्जुन कपूर- या कपल्सबद्दल बी- टाउनमध्ये नेहमीच चर्चा असते. त्यांच्या डिनर डेटपासून ते बर्थडे विश करेपर्यंत प्रत्येक गोष्टीची बातमी होते. असं म्हटलं जात होतं की, या वर्षी दोघं लग्नबंधनात अडकणार होते. पण जसा करोना सुरू झाला, या चर्चाही बंद झाल्या. रणबीर कपूर- आलिया भट्ट जेव्हापासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत आहेत तेव्हापासूनच दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही कुटुंबामध्येही चांगले संबंध आहेत. लॉकडाउनच्या काळात रणबीरच्या घरीच आलिया राहत असल्याचं म्हटलं गेलं होतं. यावर्षी दोघं लग्न करणार होते. पण करोनामुळे त्यांनी हा विचार बदलला. अली फजल- ऋचा चड्ढा अली फजल आणि ऋचा चड्ढा यांनी यंदाच्या वर्षी लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी लग्नाची तयारीही सुरू केली होती. मात्र त्याच काळात लॉकडाउन सुरू झालं. यानंतर दोघांनीही लग्न काही महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण आता हे जोडपं कधी लग्न करणार याबद्दल कोणतीच माहिती त्यांनी दिलेली नाही. फरहान अख्तर- शिबानी दांडेकर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या बॉण्डिंगचे तर त्यांचे चाहते दिवानेच आहे. हे जोडपंही यंदा लग्न करणार होते असं म्हटलं जात होतं. वरुण धवन- नताशा दलाल वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या चर्चा २०१९ पासूनच सुरू आहेत. २०२० मध्ये दोघं लग्न करणार असल्याचंही म्हटलं गेलं होतं. पण वरुणने यावर कधीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आता २०२१ मध्ये तरी वरुण आणि नताशा गुड न्यूज देत आहेत का हे पाहावं लागेल. आदर जैन- तारा सुतारिया आदर जैन आणि तारा सुतारिया यांनी दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं. यासोबतच आदर लवकरच तारासोबत लग्न करणार असल्याचं बी- टाउनमध्ये बोललं गेलं. आता २०२० मध्ये जरी त्यांचं लग्न झालं नाही तर २०२१ मध्ये होईल अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37i6ynB
