Full Width(True/False)

कार्तिक- जान्हवी मधला 'दोस्ताना' संपला? एकमेकांना केलं अनफॉलो

मुंबई- बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि बेबी डॉल यांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे. त्यांच्या नवीन सिनेमाच्या तयारीसाठी नाही तर दोघं अनेकदा एकत्र फिरताना दिसायचे. नुकत्याच नवीन वर्षाच्या निमित्ताने दोघंही गोव्यात एकत्र गेले होते. मात्र, आता दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. दोघांमध्ये एवढा दुरावा का आले हे अजूनही त्यांच्या चाहत्यांना कळत नाहीए. या महिन्याच्या सुरुवातीला कार्तिक आणि जान्हवी गोव्यात एकत्र दिसले होते. त्यांना पाहून दोघंही रोमँटिक डेटवर गेले आहेत असंच साऱ्यांना वाटलं होतं. सुट्ट्या एकत्र घालवल्यावर दोघांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं होतं. आता या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा चं चित्रीकरण लांबणीवर पडल्याचं कळलं. सिनेमाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनला जाणार होती, पण इंग्लंडमध्ये करोना विषाणूमुळे पुन्हा लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं. जान्हवी कपूरच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर नुकतच तिने 'गुड लक जेरी' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय जान्हवी राजकुमार राव याच्यासोबत 'रुही अफसाना' सिनेमातही दिसणार आहे. तर कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘धमाका’ सिनेमाचं शूटिंग करत आहे. यासोबतच कार्तिक कियारा अडवाणीसोबत 'भूल भूलैया २' मध्ये दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oun7lE