Full Width(True/False)

देशद्रोह आरोप प्रकरणी कंगनाला मोठा दिलासा; हायकोर्टाने पोलिसांना दिले 'हे' निर्देश

मुंबई: देशद्रोहाच्या आरोप प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण यांना मुंबई हायकोर्टाकडून २५ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे. अटकेसारखी कठोर कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिले आहेत. कंगनाची आणखी चौकशी करायची असल्याचं मुंबई पोलिसांतर्फे कोर्टात सांगण्यात आलं. मात्र, २५ जानेवारीच्या पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कंगनाला चौकशीसाठी बोलावू नये, असेही निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. काय आहे प्रकरण? समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल. यामुळे जातीय सलोखा, तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशा हेतूने हिने सोशल मीडियावर वारंवार विधाने केली. याप्रकरणामध्ये दोघींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर व फिटनेस ट्रेनर मुनावरअली सय्यद हे पोलिसांत गेले. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं सय्यद यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर वांद्रे पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये भारतीय दंड संहितेच्या १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणात चौकशीला हजर राहण्यासाठी कंगनाला तीन वेळा समन्स जारी करण्यात आले. मात्र, भावाचे लग्न, शूटिंगचे कारण देऊन दोघींनी मुदत घेतली होती. अखरे कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींची वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी दोन तास करून चौकशी केली. दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्यामुळं दोघींच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात दोघींचे जबाब नोंदविण्यात आले. पोलिसांनी दिलेली मुदत संपत आल्यानं पुढील कारवाई टाळण्यासाठी कंगना आणि रंगोली आपल्या वकिलासोबत शुक्रवारी दुपारी १च्या सुमारास वांद्रे पोलिस ठाण्यात हजर झाल्या होत्या. भावना दुखावणारे, समाजात तेढ करणारे वक्तव्य सोशल मीडियावर करण्यामागचा नेमका उद्देश काय? कुणाच्या सांगण्यावरून असे केले का? याबाबतचे दोघींचे म्हणणे जाणून घेतले. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी झाल्यानंतर तीनच्या सुमारास दोघी पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्या होत्या. मला का छळले जातेय?पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यापूर्वी कंगना हिने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तिनं, 'मला मानसिक, भावनिक आणि आता शारीरिक का छळलं जात आहे,' असा सवाल केला. चौकशीनंतरही एक ट्वीट करीत, 'तुम्ही देशविरोधी असाल, तर तुम्हाला पाठींबा मिळतो, तुमचे कौतुक होतं. मात्र, राष्ट्रवादी असाल, तर एकट्यालाच उभे राहावे लागते,' असे म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nCepRD