Full Width(True/False)

संजय दत्तची मुलगी त्याला बाबा नाही तर काका हाक मारायच, पण का?

मुंबई : अभिनेता बॉलिवूडमधील एक टॉपचा कलाकार. बॉलिवूडला अनेक सुपरहीट चित्रपट दिलेला हा कलाकार नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. संजू बाबाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याचे अफेअर्स, राजकारणामध्ये त्याने केलेली एण्ट्री, जेलमध्ये त्याने काढलेले दिवस अशा अनेक कारणांमुळे संजू बाबा टॉक ऑफ द टाऊन ठरतोच. आताही त्याचा एक किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संजयची मुलगी त्रिशाला ही साऱ्यांना ठाऊकच आहे. सोशल मीडियावर तर या बाप-लेकीच्या जोडीचे बरेच फोटोही व्हायरल होताना दिसतात. त्रिशाला ही संजू बाबाची पहिली पत्नी अभिनेत्री रिचा शर्माची मुलगी. पण त्याने त्रिशालाला कधीच अंतर दिले नाही. मात्र त्रिशाला तिच्या बालपणी आपल्या वडिलांना चक्क काका म्हणून हाक मारायची. आपली मुलगीच आपल्याला काका म्हणून हाक मारते हे ऐकून संजयचा ही तेव्हा राग अनावर झाला. या कारणामुळे रिचा आणि संजयमध्ये वादाची ठिणगी पडली. दोघांच्या नात्यामध्येही कटूता निर्माण झाली. त्रिशालाला रिचा चुकीची शिकवण देत असल्याचं संजचं म्हणणं होतं. काका म्हणून हाक मारायची हे रिचा आपल्या मुलीली शिकवते असं संजयचं स्पष्ट मत होतं. यावरुन संजय-रिचामध्ये अनेक मतभेदही झाले. रिचा शर्मादेखील बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. एका हिंदी चित्रपटाच्या मुहुर्तावेळी संजय-रिचा पहिल्यांदा भेटले. १९८७ आग आग या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना संजयने तिला लग्नासाठी विचारले. रिचाने काही दिवसांनी संजयला होकार कळवला. आणि १९८७ मध्येच या दोघांनी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधील तेव्हाचं हे बहुचर्चित कपलला बऱ्याच अडचणींचा सामना देखील करावा लागला. लग्नानंतर काही वर्षांनी रिचाला ब्रेन ट्यूमर या आजाराला सामोरे जावे लागले. रिचा ब्रेन ट्युमरशी लढत असताना संजय आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या अफेअर्सच्या चर्चांनी जोर धरला. आणि यामुळे रिचा आणि संजयच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. ब्रेन ट्यूमरने त्रासलेल्या रिचाकडे संजयनेही काना डोळा केला. अखेरीस १० डिसेंबर १९९६ला रिचाने अखेरचा श्वास घेतला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MhJEoG