Full Width(True/False)

कतरिनामुळे संपलं या अभिनेत्रीचं करिअर, सलमाननेच केलं होतं लॉन्च

मुंबई: अभिनेत्री ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचा नवा चित्रपट असो वा रिलेशनशिप नेहमीच काही ना काही कारणाने ती बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरते. पण आता एका वेगळ्या कारणामुळे कतरिनाच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. कतरिनामुळे बॉलिवूड अभिनेत्री झरिन खानचं करिअर संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे आणि विशेष म्हणजे झरिनला सुद्धा अभिनेता सलमान खाननं लॉन्च केलं होतं. पण असं असतानाही तिला बॉलिवूडमध्ये म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये झरिननं तिच्या करिअरमधील चढ-उतारावर भाष्य केलं. आपल्या करिअरमधील अपयशाबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आले तेव्हा सातत्यानं माझी तुलना कतरिना कैफ सोबत केली जात होती. ही गोष्ट मला खुपच निराश करणारी होती. पण मी कधीच हार मानली नाही.’ तसं पाहायला गेलं तर बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्रीची दुसऱ्या अभिनेत्रीशी तुलना होणं हे काही नवीन नाही. याधीही प्रीती झिंटाची अमृता सिंहशी आणि अमिषा पटेलची निलम सोबत तुलना केली गेली आहे. झरिन सांगते, ‘माझ्यासमोर सुरुवातीपासूनच अनेक समस्या होत्या. माझा डेब्यू चित्रपट ‘वीर’ जेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. तेव्हा त्यासाठी मला जबाबदार धरण्यात आलं. त्यावेळी मी नवीन होते आणि कामात म्हणावं तेवढं परफेक्शन नव्हतं. पण कोणीच मला समजून घेतलं नाही. लोकांनी मला टार्गेट केलं आणि त्या चित्रपटानंतर मला काम मिळणं सुद्धा कठीण झालं.’ झरिनच्या मते, ती कतरिना कैफ सारखी दिसत असल्यानं तिचं सर्वाधिक नुकसान झालं. कतरिना त्यावेळी एक आघाडीची अभिनेत्री होती आणि अशावेळी कोणताही फिल्ममेकर तिच्या ऐवजी तिच्यासारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीसोबत काम करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे कतरिना सारखं दिसणं झरिनाचं करिअर संपुष्टात येण्याचं कारण ठरलं. बद्दल झरिन सांगते, ‘सलमाननं माझं लाइफ बदलून टाकलं. त्यानं मला त्याच्या चित्रपटातून लॉन्च केलं त्यामुळे लोकांना अजूनही वाटतं की, मला आताही जे चित्रपट मिळतात ते सलमानमुळेच मिळतात. पण असं अजिबात नाही. त्यानं मला या इंडस्ट्रीमध्ये आणलं हे खरं आहे पण त्यानंतर मला जे चित्रपट मिळाले ते माझं काम पाहिल्यावरच मिळाले. माझ्या करिअरच्या वाईट काळात सलमाननं मला ‘कॅरॅक्टर ढीला’मध्ये दुसरी संधी देखील दिली होती. पण मी अशी नेहमीच त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे यापुढेही मला जे काही करायचं आहे ते स्वतःच्या बळावर करायचं आहे.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r3goAP