मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री यांना तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. ११ जानेवारी रोजी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. विरुष्काने अजूनही त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अनोख्या पद्धतीने मुलीचं नाव चाहत्यांना सांगितलं होतं. आता तीन महिन्याची झाली आहे. याच दरम्यान विराटने त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून एक मुलाखत दिली. त्यात त्याने एक बाप म्हणून त्याच्या मुलीसोबतच्या तीन महिन्याच्या प्रवासाचं वर्णन केलं आहे. नुकतीच विराटने एक मुलखात दिली. त्याने वामिकाला आयुष्य बदलून टाकणारी म्हटलं आहे. मागील तीन महिन्यात त्याला बाप म्हणून कोणते अनुभव आले ते विराटने मुलाखतीत सांगितलं आहे. विराट म्हणाला की, 'आता जेव्हा घरात वामिका आली आहे तेव्हा सगळंच खूप वेगळं आहे. संपूर्ण आयुष्य खूप वेगळं झालं आहे. कारण, जेव्हा तुम्ही बाबा बनता तेव्हा तो अनुभव दुनियेतील सगळ्यात अनुभवांपेक्षा खूप वेगळा असतो. एक बाबा होणं तुमच्या आयुष्याला एक मोठा बदल घेऊन येतं.' वामिकाचा सांभाळ करण्याबाबत तो म्हणाला, 'जेव्हा तुम्ही एका बाळाची काळजी घेत असता तेव्हा तुम्हाला खूप सतर्क राहावं लागतं. मुलांना सांभाळण्यामध्ये आईचा वाटा जास्त असतो. परंतु, एक बाप म्हणून तुमच्या जबाबदारीतदेखील वाढ होते. तुमची देखील अनेक कर्तव्य असतात. कारण बाळाला सांभाळणं दोघांसाठीही एक वेगळाच अनुभव असतो आणि त्यातून मिळणारा आनंद तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. जेव्हा तुमची मुलगी हसते तेव्हा तिला हसताना बघणं तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त आनंदाचा आणि सुंदर क्षण असतो.' वामिकाच्या घरी येण्याने त्याच्या आयुष्यात खूप जास्त बदल झाल्याचं देखील त्याने सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3acKkVa