Full Width(True/False)

मिलिंद गवळींनी सुनील बर्वेंसोबतच्या आठवणींना दिला उजाळा, ही खास पोस्ट वाचाच!

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील दोन एव्हरग्रीन अभिनेता कोण असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा दोन नावे चटकन डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील सत्यजीतदादा अर्थात आणि 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अविनाश देशमुखची भूमिका साकारणारे अभिनेता यांचे... मराठीमधील हे दोन्ही एव्हरग्रीन कलाकार सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील दोन वेगवेगळ्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत आहेत. परंतु २६ वर्षांपूर्वी या दोघांनी एका मराठी सिनेमात एकत्र काम केले होते. या आठवणींना मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्ट द्वारे उजाळा दिला आहे. तसेच या पोस्टमधून सुनील बर्वेला एक प्रश्न देखील विचारला आहे... काय लिहिले आहे पोस्टमध्ये मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. ते विविध पोस्टद्वारे त्यांच्या कामाची माहिती चाहत्यांना देत असतात शिवाय काही जुन्या आठवणीही शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी अभिनेता सुनील बर्वेसोबतच्या काही आठवणींना पोस्टद्वारे उजाळा दिला आहे. त्यांनी लिहिले आहे, 'आपण आपल्या गोड मित्राला भेटतो तेव्हा २६ वर्षांचा आमच्या दोघांचा सिनेमा क्षेत्रातला प्रवास आठवतो. गेल्या २६ वर्षांत एकदाही परत एकत्र काम करायची आम्हाला संधी मिळाली नाही, खूप वर्षांपूर्वी गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित 'असंच पाहिजे नवंनवं' या चित्रपटांमध्ये सोन्या आणि आशुतोष गोवारीकर काम करणार होते. काही कारणांमुळे ते दोघं चित्रपट करू शकत नव्हते. सोन्याच्या रोलसाठी मला विचारलं आणि आशुतोष गोवारीकरचा रोलसाठी अंकुश चौधरीला विचारलं. तेव्हा मी सुनीलला फोन केला होता, की असा एक चित्रपट माझ्याकडे आला आहे. ज्यामध्ये आधी तू काम करणार होतास. काय करू... मी करू का हा चित्रपट? सुनील म्हणाला अगदी नक्की कर. माझ्या तारखा जुळत नाही म्हणून मी तो करू शकत नाही. पण तू नक्की कर...’ मिलिंद यांनी पुढे लिहिले आहे, ‘आम्ही मात्र 'आई' चित्रपटानंतर कधी ही परत एकत्र काम केलं नाही. विचार केला तर असं वाटत राहतं की, आम्ही परत एकत्र काम केलं असतं तर किती मजा आली असती. म्हणून सारखं वाटत राहतं की सिनेमा क्षेत्र हा सगळा योगायोगाचा खेळ आहे.' मिलिंद यांनी पुढे लिहिले आहे की, ' वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक गोल्डन ज्युबली सिनेमा एकत्र केला. छान आठवणी इतकी वर्षे जोपासल्या. आताही अचानक भेट झाली की घट्ट मिठी मारतो ,मनसोक्त हसतो,आयुष्यातल्या सुख-दुःखाच्या गप्पा मारतो. हे छानच आहे की, एवढं तरी कुठे बाकीच्या कलाकारांच्या नशिबी येतं. एकत्र काम करत नसलो तरी,काम करत आहोत हेच खूप आहे. सुन्या तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा.' सुनीलनंही पोस्ट शेअर करत केलं कौतुक दरम्यान, मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सुनील बर्वे यांनीही शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत मिलिंद यांचे भरभरून कौतुक केले आहे. सुनीलने लिहिले आहे, 'अरे मित्रा.. किती गोड लिहिलं आहेस... माझ्याबद्दल इतकं भरभरून लिहिणारा तू माझा एक उत्तम सहकलाकार आहे.हे सारं लिहिण्यासाठी मोठं मन आणि हृदय लागतं. असाच निर्मळपणा जपू या! खूप सारं प्रेम...'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DnsrQy