Full Width(True/False)

'विक्टिम कार्ड वापरू नकोस', काम्या पंजाबीनं स्नेहाला दिली समज

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये बिग बॉसचा आवर्जून समावेश केला जातो. बिग बॉस मग तो हिंदी असो वा मराठी त्यामध्ये भांडणे, ड्रामेबाजी या गोष्टी तर सर्रास होत असतात. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सदस्य त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित किस्से, खुलासे या कार्यक्रमात दुसऱ्या स्पर्धकांशी मनमोकळेपणाने बोलताना दिसतात. या अशा गॉसिपमुळे बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो अनेकदा वादग्रस्तही ठरतो. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. या पर्वातील काही स्पर्धकांबद्दलचे काही वाद आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. च्या घरात स्पर्धक म्हणून अभिनेत्री सहभागी झाली आहे. स्नेहासोबत तिचा पहिला नवरा अविष्कार दारव्हेकर हा देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता हे दोघेजण बिग बॉसच्या घरात १०० दिवस एकत्र राहणार ही एक मोठी बातमी होती. त्यामुळे हे दोघे खूप चर्चेत आहेत. बिग बॉस मराठी ३ च्या घरात स्नेहाने तिच्या व्यक्तिगत आयुष्याबदद्ल सांगितले. नेहाने सांगितले की तिची दोन्ही लग्ने अयशस्वी ठरली आहेत. ही लग्ने का अपयशी ठरली याची कारणे देखील तिने सांगितली. स्नेहाने जे काही सांगितले आहे त्यावर काम्या पंजाबीने एक ट्वीट करत स्नेहाला चांगलीच 'समज' दिली आहे. त्यामुळे काम्याचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. काम्याने नेमके काय लिहिले स्नेहाने बिग बॉस मराठी ३ मध्ये तिच्या अपयशी ठरलेल्या दोन्ही लग्नांबद्दल सांगितले. त्यानंतर काम्याने ट्वीट करत लिहिले की, 'तुला बिग बॉसच्या घरात जायचे होते. आता तू त्या घरात आहेस, ही चांगली गोष्ट आहे. परंतु या घरात खेळताना तू विक्टिम कार्ड का खेळत आहेस? तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल मला माहिती नाही. परंतु केवळ चार दिवसांच्या खेळासाठी दुसऱ्या लग्नाबद्दलच्या गोष्टी रचून सांगू नकोस. याबद्दल खरे काय आहे, हे मला माहिती आहे याची तुला जाणीव आहे. त्यामुळे चांगलेपणाने खेळ खेळ. खेळ खेळताना घाणेरडेपणा करू नकोस.' असे लिहित ट्विटच्या शेवटी काम्याने बिग बॉस मराठी ३ असा हॅशटॅग वापरला आहे. अविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ यांनी लग्न केले होते. त्यावेळी स्नेहा १९ वर्षांची होती. परंतु स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावत त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्नेहाने अनुराग सोलंकीसोबत लग्न केले. परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही हे दोघेजण वेगळे झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3CuEXw6