Full Width(True/False)

अक्षय कुमारच्या पाया पडून कतरिना कैफने मागितली माफी

मुंबई- या आठवड्यात '' मध्ये आणि त्यांच्या '' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. अक्षय आणि कतरिनाने एकमेकांशी संबंधित अनेक रंजक खुलासे केले. यासोबतच दोघंही एकमेकांची थट्टा करतानाही दिसले. या दरम्यान अक्षय कतरिनाबद्दल असं काही बोलला की तिने चक्क अक्षयचे पाय धरले आणि माफी मागितली. त्याचं झालं असं की, जेव्हा कतरिना कपिल शर्मा शोच्या स्टेजवर आली तेव्हा ती अक्षय सोडून सर्वांना भेटली आणि अभिवादन केलं. हे पाहून अक्षय नाराज झाला आणि त्याने लगेचच ही बाब सर्वांसमोर मांडली. अक्षय म्हणाला, 'तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, कतरिनाने एण्ट्री घेतल्यावर तिने सर्वांनाच नमस्कार केला. तुम्हाला (अर्चना पूरण सिंग), तुला (कपिल शर्मा) सगळ्यांनाच ती हॅलो म्हणाली. पण माझ्याकडे पाहिलेली नाही. सीनिअर्सना असा मान दिला जातो.' हे ऐकून कतरिनालाही आपणं चूक केल्याचं लक्षात आलं आणि तिने लगेच स्वतःला म्हटलं की, 'नाही, हे बरोबर नाही.' एवढं बोलून ती थांबली नाही तर ती लगेच अक्षयच्या पायाही पडली. हे पाहिल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कपिलच्या शोमध्ये अक्षय आणि कतरिनाने 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटशी संबंधित किस्सेही सांगितले. अक्षयने सांगितले की, एका सीनमध्ये कतरिनाने खरोखरच त्याच्या कानशिलात लगावली होती. 'सूर्यवंशी' सिनेमा ५ नोव्हेंबरला रिलीज झाला. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवग यांनीदेखील पाहूण्या कलाकाराची भूमिका वठवली आहे. दुसऱ्या लॉकडाउननंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा 'सूर्यवंशी' हा पहिलाच सिनेमा आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने विक्रम केला असून त्या दिवशी सिनेमाने २६.२९ कोटींची कमाई केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BRyqLf