मुंबई- बॉलिवूड अभिनेता '' चित्रपटातील अभिनयासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'अंतिम' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'अंतिम' मधील आयुषच्या अभिनयाचं देखील प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आयुष हा बॉलिवूड अभिनेता याच्या बहिणीचा पती आहे. डेटिंग करण्यापूर्वी आयुष आणि अर्पिता तीन वर्ष चांगले मित्र होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयुषने अर्पितासोबत लग्नासाठी आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. लग्नासाठी सलमानचा होकार मिळवणं तितकंसं अवघड नसल्याचं त्याने म्हटलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आयुषला विचारलं गेलं, 'जेव्हा तु अर्पितासोबत रिलेशनमध्ये होतास तेव्हा सलमानची प्रतिक्रिया काय होती? त्याचा होकार मिळवणं अवघड होतं?' त्यावर आयुष म्हणाला, 'मुळीच नाही. सलमानचं मन जिंकणं मला अवघड नाही वाटलं जितकं अर्पिताला समजून घेणं अवघड आहे. अर्पिताला समजून घेणं माझ्यासाठी जास्त कष्टदायक होतं. डेटिंग करण्यापूर्वी आम्ही तीन वर्ष चांगले मित्र होतो. पण सलमानला समजावणं सोपं होतं. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो तेव्हा खूप घाबरलेलो. मी त्यांना म्हणालो, हाय मी आयुष शर्मा. सलमान म्हणाले, हाय मी सलमान खान.' पुढे आयुष म्हणाला, 'मला असं वाटलं की तुम्हाला कोण नाही ओळखत? त्यांनी मला चार- पाच प्रश्न विचारले आणि मी त्यांना खरी खरी उत्तरं दिली. त्यांना वाटलं की मी प्रामाणिक आहे. त्यांना मी थोडासा आवडलो. मी त्यांना म्हटलं की, मी बेरोजगार आहे. मी अजून शिकतोय. माझ्याकडे जे काही आहे ते माझ्या आई- वडिलांचं आहे. यावर सलमान खुश झाले. त्यांना वाटलं की हा पहिला व्यक्ती आहे जो स्वतःच्या तोंडाने सांगतोय की माझ्याकडे काहीच नाहीये. त्यांना माझा प्रामाणिकपणा आवडला. त्यानंतर त्यांनी माझ्या आणि अर्पिताच्या लग्नासाठी होकार दिला.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3px9FzL