Full Width(True/False)

मुंबईने जितेंद्र जोशीला काय दिलं? अभिनेत्याने स्पष्टच सांगून टाकलं

लॉकडाउनच्या काळात माझा मित्र आणि दिग्दर्शक निशिकांत कामतच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्याची सोबत करता आली. त्या काळात आमचं अनेक गोष्टींवर बोलणं झालं. पण निशी गेल्यावर त्याच्याविषयी अनेक उलट-सुलट गोष्टी कानावर पडल्या. त्या दिवशी ठरवलं त्याच्या नावानं काही तरी करायला हवं. मग निखिल महाजन या माझ्या दिग्दर्शक मित्राला फोन केला. तेव्हा तो म्हणाला की, काही करायचं असेल तर चित्रपट कर. तिथून 'गोदावरी' या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. निर्माता झालो. विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि इतर सर्व कलाकारांनी आपलेपणानं चित्रपटासाठी काम केलं आहे. चित्रपट ही सर्वप्रथम एक कला आहे. या कलेचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. प्रेक्षकांना एखादी कलाकृती आवडली तर चित्रपटाला आपसूक अधिक फायदा होतो. निर्मिती करताना चित्रपट हा एक व्यवसाय आहे, हे विसरून चालत नाही. कला आणि व्यवसाय या एकमेकांत गुंतलेल्या दोन गोष्टी आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/orNwcWh