Full Width(True/False)

कोण आहे ती 'दीदी' जिच्यावरून अर्चनाने शिवचा गळा पकडला

नुकतेच 'बिग बॉस १६' मध्ये जे घडले त्याची कोणीही कल्पना केली नसेल. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात झालेल्या भांडणानंतर बिग बॉसने कारवाई करत अर्चनाला मध्यरात्रीच शोमधून बाहेर काढले. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यातील भांडणाचं मूळ काय होतं, याचं कारण निर्मात्यांनी रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये समोर आलं आहे. भांडणाच्यावेळी अर्चनाने अत्यंत चुकीचा शब्द उच्चारला असला तरी त्यानंतर शिव ठाकरे याने वैयक्तिक टिप्पणी केल्याने अर्चना गौतम भडकली आणि तिने शिवचा गळा पकडला. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, वादाच्यावेळी शिव ठाकरेने 'दीदी'चा उल्लेख केला होता, ज्याच्या उल्लेखाने अर्चनाच्या रागाचा पारा चढला. अर्चनाचा संयम सुटला आणि ती शिवसोबत हमरीतुमरीवर आली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Jm4rjdx