Full Width(True/False)

'तेराव्याला बाबांना जे सांगायचं ते सांगितलं', चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे वृत्त १५ जुलै रोजी समोर आले आणि संपूर्ण सिनेरसिकांना धक्का बसला होता. पुणे जिह्ल्यात तळेगाव-दाभाडेमध्ये असणाऱ्या आंबी गाव परिसरात ते ८ महिन्यांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. याठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आलेला, शिवाय त्यांचे निधन २ दिवसापूर्वीच झाले असावे असा अंदाज व्यक्त केला गेला. यानंतर महाजनी कुटुंबावर जोरदार टीका झाली. त्यांचा मुलगा गश्मीरचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते का? मुलगा मोठा स्टार असताना ते एकटे का राहायचे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती अभिनेत्याच्या कुटुंबावर करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी गश्मीरने यावर इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले होते की तो योग्य वेळ आली की कदाचित तो भविष्यात याविषयी बोलेल. आता गश्मीरने त्याच्या चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/3xwl51f