Full Width(True/False)

करिना कपूरने 'कहो ना प्यार है' सोडला नव्हता तर तिची हकालपट्टी... अमिषा पटेलच्या वक्तव्याने खळबळ

अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असणारा 'गदर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. या सिनेमाचा थिएटरमध्ये चौथा आठवडा सुरू असून लवकरच ५०० कोटींचा टप्पा गाठण्यात येईल. सध्या गदर २ ची कमाई ४८७ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान या सिनेमाची ओळख गदरची 'सकीना' म्हणून तर आहेच, पण 'कहो ना प्यार है'ची 'सोनिया' म्हणूनची तिला चाहते ओळखतात. दरम्यान अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या या डेब्यू चित्रपटाबाबत एक उलगडा केला आहे, यामुळे अभिनेत्री करिना कपूरच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. सुरुवातीला असे समोर आलेले की या सिनेमातून बॉलिवूडची 'बेबो' अर्थात करिना कपूर पदार्पण करणार आहे, मात्र अर्ध्या शूटनंतर तिने चित्रपट सोडला. दरम्यान आता करिनाने चित्रपट सोडला नव्हता तर दिग्दर्शक राकेश रोशन यांनी तिला काढून टाकले होते अशी माहिती अमिषाने दिली. त्यावेळी राकेश यांनीच करिनाला सिनेमा सोडण्यास सांगितले होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fip8AGg