मुंबई:अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधली घराणेशाही, नवोदित कलाकारांना न दिली जाणारी संधी यावरुन वाद उफाळून आला. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपनं, सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून माझं करिअर संपवलं अशी धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. पण, सलमानच्या चाहत्यांना हे काही पटलेलं नाही. त्यांनी सलमानला पाठिंबा दिला असल्याचं दिसून येतंय. अभिनव कश्यपनं काही दिवसांपूर्वी ही पोस्ट करून एकच खळबळ उडवून दिली. सल्लूवर आणि त्याच्या कुटुंबावर केलेले आरोप असल्यानं ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. त्यानंतर सलमानचे वडिल सलीम खान यांनी, 'अभिनवला जे करायचे आहे ते करु द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही' असं म्हटलं होतं. त्यानंतर भाऊ अरबाज खाननं या विरोधात कारवाई केली जाईल, असं म्हटलं होतं. सोशल मीडियावर सुरुवातीला सलमानला ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु, आता सलमानच्या चाहत्यांनी सलमानला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर #WeStandBySalmanKhan ट्रेंड होत आहे. जवळपास तीन लाख चाहत्यांनी सलमान खानला पाठिंबा दिल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, सुशांतच्या चाहत्यांनी सलमान खानविरोधाक रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं. काही ठिकाणी त्याच्या 'बीइंग ह्युमन' ब्रॅंन्डच्या शोरुमची चोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर सुशांत विरुद्ध सलमान खानचे चाहते असं युद्ध रंगताना दिसत होतं. हा सर्व प्रकार पाहता सलमान यानं एक ट्विट करत त्याच्या चाहत्यांना सुशांतच्या कुटुंबियांसोबत राहण्याची विनंती केली आहे. ‘मी माझ्या सर्व चाहत्यांना सुशांतच्या चाहत्यांसोबत उभं राहा आणि चुकीच्या भाषेचा वापरू नका अशी विनंती क,तो. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. या संकटाच्या काळात सुशांतच्या कुटुंबाला साथ द्यायला हवी, आपल्या व्यक्तीला गमावणं हे खूप वेदनादायी असतं', असं सलमाननं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर 'किस देश में है मेरा दिल', 'पवित्र रिश्ता' या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर 'काय पो छे' सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'राबता', 'पिके', 'छिछोरे' या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/315hKRC