Full Width(True/False)

'असं' होणार होतं सुशांत अंकीताचं लग्न; शेअर केले होते वेडींग प्लॅन्स

मुंबई: दिवंगत अभिनेता याच्या आत्महत्येला महिना उलटून गेलाय. तरी, त्याच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीएत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड देखील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंकिता आणि सुशांतचा ब्रेक अप झाला नसता तर सुशांतनं हे पाऊल उचचलं नसतं, असं त्याचे चाहते म्हणतायत. पुन्हा एका या दोघांचा 'पवित्र रिश्ता' चर्चेत आला आहे. तब्बल सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अंकिता आणि सुशातं लग्न करणार होते. चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाबाबात उत्सुकता होती. त्यांना सतत लग्नाबद्दल प्रश्न विचारले जायचे. दोघंही उघडपणे लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगायचे.पण अचानक त्यांच्यात काही तरी बिनचलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सुशांत आणि अंकिता यांच्या लग्नाच्या बातम्या दर काही दिवसांनी येतच असायच्या. मात्र, अंकितानं पहिल्यांदाच तिला कशा पद्धतीनं लग्न करायचं आहे हे जाहीरपणे सांगितलं होतं. अंकिताला राजपूत पद्धतीनं लग्न करायचं होतं. तेही अगदी साग्रसंगीत. अर्थात, अंकितानं असं सांगण्यामागंच कारणही होतं. अंकितानं आपल्या शाही थाटात लग्न करायचंय असं सांगितलं होतं. तसंच सुशांतनं आपल्या जवळच्या मित्रांना लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. १५ दिवसांचा वेळ काढून उदयपूर किंवा जयपूरमध्ये त्यांना लग्न करायला आवडेल असं अंकिता आणि सुशांतनं सांगितलं होतं. अंकिताला राजस्थानी पद्धतीनं आणि भव्यता असलेलं लग्न करायचं होतं. सुशांत हत्तीवर बसून लग्नाच्या वरातीबरोबर लग्नाच्या मंडपात यावा असंही तिला वाटत होतं. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी मध्ये खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g0put6